शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 15:36 IST

Rahul Gandhi News: नरेंद्र मोदी केवळ २० ते २५ जणांना अब्जाधीश करू शकतात. मात्र, काँग्रेस पक्ष कोट्यवधी लोकांना लखपती करू शकतो, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi News: राम मंदिराचे एवढे लोकार्पण करण्यात आले. परंतु, त्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात केवळ अब्जाधीश, बॉलिवूडचे कलाकार आणि क्रिकेटर दिसले. या सोहळ्यात गरीब सामान्य आणि शेतकरी कुठे दिसले का, अशी विचारणा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली. ग्वालियर-चंबल अंचल येथील एका प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर टीका केली. 

ही विचारधारेची लढाई आहे. काँग्रेस पक्ष संविधान वाचवण्याचे प्रयत्न करत आहे. संविधानामुळे गरिबांना हक्क मिळाले आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, तर संविधान बदलणार आहेत. हीच आता देशात मुख्य लढाई सुरू आहे. केवळ २० ते २५ अब्जाधीशांकडून देश चालवला जावा, हीच भाजपाची इच्छा आहे. तुम्ही जर आरक्षणाला विरोध करत नाही, मग सरकारी क्षेत्राचे खासगीकरण का करत आहात, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. तसेच अग्निवीर योजनेवरून राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला.

गरिबांची यादी बनवून एक लाख रुपये खात्यात जमा करणार

पंतप्रधान मोदी प्रचारात व्यस्त आहेत आणि २४ तास त्यांनाच दाखवले जात आहे. नरेंद्र मोदी केवळ २० ते २५ जणांना अब्जाधीश करू शकतात. मात्र, काँग्रेस पक्ष कोट्यवधी लोकांना लखपती करू शकतो. आम्ही गरिबांची एक यादी तयार करणार आहोत. एका महिलेचे नाव निवडले जाईल आणि त्या महिलेच्या खात्यात एका वर्षात एक लाख रुपये जमा केले जातील, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

दरम्यान, देशातील बेरोजगार युवकांना प्रशिक्षणाची संधी मिळत नाही. इंडिया आघाडीचे सरकार सर्व पदवीधारक आणि डिप्लोमा केलेल्यांना नोकरीची गॅरंटी देणार आहे. चांगल्या कंपनीत प्रशिक्षणाची संधी दिली जाईल. तसेच तुमच्या खात्यात एक लाख रुपये जमा केले जातील, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याचा अपमान केला आहे. भारतीय लष्कराला अग्निवीर योजना नको आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांनी ही योजना सैन्यावर थोपली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसmadhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४