शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

Rahul Gandhi : "डबल इंजिन सरकार म्हणजे बेरोजगारांना डबल..."; राहुल गांधींचं भाजपावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 14:21 IST

Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आज त्यांच्या न्याय यात्रेदरम्यान भाजपाच्या डबल इंजिन सरकारच्या यशाच्या दाव्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज त्यांच्या न्याय यात्रेदरम्यान भाजपाच्या डबल इंजिन सरकारच्या यशाच्या दाव्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील मोदी सरकार आणि यूपीतील योगींच्या भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी "डबल इंजिन सरकार म्हणजे बेरोजगारांना डबल फटका"असं म्हटलं आहे. तसेच त्यांची न्याय यात्रा शनिवारी उत्तर प्रदेशमध्ये पोहोचली. 

राहुल यांनी आपल्या ट्वि़टर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आज उत्तर प्रदेशातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगारी नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. जिथे दीड लाखांहून अधिक सरकारी पदं रिक्त आहेत, तिथे पदवीधर, पदव्युत्तर आणि पीएचडीधारक किमान पात्रता असलेले लोक रांगेत उभे आहेत. पहिलं म्हणजे भरती निघणं हे स्वप्नच असतं."

"भरती निघाली तर पेपर फुटतो, पेपर दिला तर निकाल कळत नाही आणि प्रदीर्घ प्रतिक्षेनंतरही निकाल लागतो, अनेकदा रुजू होण्यासाठी न्यायालयात जावे लागते. लष्करापासून रेल्वेपर्यंत आणि शिक्षणापासून पोलिसांपर्यंत भरतीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहिल्यानंतर लाखो विद्यार्थी ओव्हरएज झाले आहेत."

"निराशेच्या या चक्रव्यूहात अडकलेला विद्यार्थी डिप्रेशनला बळी पडत आहे आणि खचून जात आहे. या सगळ्यामुळे व्यथित होऊन जेव्हा तो आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याला पोलिसांच्या लाठीमार करण्यात येतो. विद्यार्थ्यासाठी नोकरी हे केवळ उत्पन्नाचे साधन नसून त्याच्या कुटुंबाचे जीवन बदलण्याचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न भंगल्याने संपूर्ण कुटुंब निराश होतं" असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणUnemploymentबेरोजगारी