शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi : "डबल इंजिन सरकार म्हणजे बेरोजगारांना डबल..."; राहुल गांधींचं भाजपावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 14:21 IST

Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आज त्यांच्या न्याय यात्रेदरम्यान भाजपाच्या डबल इंजिन सरकारच्या यशाच्या दाव्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज त्यांच्या न्याय यात्रेदरम्यान भाजपाच्या डबल इंजिन सरकारच्या यशाच्या दाव्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील मोदी सरकार आणि यूपीतील योगींच्या भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी "डबल इंजिन सरकार म्हणजे बेरोजगारांना डबल फटका"असं म्हटलं आहे. तसेच त्यांची न्याय यात्रा शनिवारी उत्तर प्रदेशमध्ये पोहोचली. 

राहुल यांनी आपल्या ट्वि़टर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आज उत्तर प्रदेशातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगारी नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. जिथे दीड लाखांहून अधिक सरकारी पदं रिक्त आहेत, तिथे पदवीधर, पदव्युत्तर आणि पीएचडीधारक किमान पात्रता असलेले लोक रांगेत उभे आहेत. पहिलं म्हणजे भरती निघणं हे स्वप्नच असतं."

"भरती निघाली तर पेपर फुटतो, पेपर दिला तर निकाल कळत नाही आणि प्रदीर्घ प्रतिक्षेनंतरही निकाल लागतो, अनेकदा रुजू होण्यासाठी न्यायालयात जावे लागते. लष्करापासून रेल्वेपर्यंत आणि शिक्षणापासून पोलिसांपर्यंत भरतीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहिल्यानंतर लाखो विद्यार्थी ओव्हरएज झाले आहेत."

"निराशेच्या या चक्रव्यूहात अडकलेला विद्यार्थी डिप्रेशनला बळी पडत आहे आणि खचून जात आहे. या सगळ्यामुळे व्यथित होऊन जेव्हा तो आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याला पोलिसांच्या लाठीमार करण्यात येतो. विद्यार्थ्यासाठी नोकरी हे केवळ उत्पन्नाचे साधन नसून त्याच्या कुटुंबाचे जीवन बदलण्याचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न भंगल्याने संपूर्ण कुटुंब निराश होतं" असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणUnemploymentबेरोजगारी