शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:12 IST

Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी हे मतचोरीचा मुद्दा सतत उपस्थित करत आहेत. त्यांनी आता मतचोरीचा संबंध बेरोजगारीशी जोडला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे मतचोरीचा मुद्दा सतत उपस्थित करत आहेत. त्यांनी आता मतचोरीचा संबंध बेरोजगारीशी जोडला आहे. बेरोजगारीवरूनभाजपा सरकारवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर तरुण आणि पोलिसांमधील संघर्ष दाखवणारा एक व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडिओमध्ये केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती" असं म्हटलं आहे. 

राहुल यांनी ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भारतातील तरुणांसमोरील सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे आणि त्याचा थेट संबंध मतचोरीशी आहे. जेव्हा एखादं सरकार जनतेचा विश्वास जिंकून सत्तेत येतं तेव्हा त्यांचं पहिलं कर्तव्य म्हणजे तरुणांना रोजगार आणि संधी उपलब्ध करून देणं. परंतु भाजपा प्रामाणिकपणे निवडणुका जिंकत नाही. ते मतं चोरून आणि संस्थांवर नियंत्रण ठेवून सत्तेत राहतात."

"तरुणांचं भविष्य अंधारात ढकललं"

बेरोजगारीवर हल्लाबोल करत राहुल गांधी पुढे म्हणाले, "बेरोजगारी ४५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. म्हणूनच नोकऱ्या कमी होत आहेत, भरती प्रक्रिया कोलमडल्या आहेत आणि तरुणांचं भविष्य अंधारात ढकललं जात आहे. म्हणूनच प्रत्येक परीक्षा पेपर फुटीच्या गोष्टींशी जोडली जाते आणि प्रत्येक भरती भ्रष्टाचाराने भरलेली असते. देशातील तरुण कठोर परिश्रम करतात, स्वप्न पाहतात आणि त्यांच्या भविष्यासाठी संघर्ष करतात. परंतु मोदी केवळ त्यांच्या स्वतःचा जनसंपर्क, सेलिब्रिटींच्या जाहिराती आणि अब्जाधीशांच्या नफ्यावर लक्ष केंद्रित करतात. तरुणांच्या आशा चिरडून टाकणं आणि त्यांना निराश करणं ही या सरकारची ओळख बनली आहे."

"नोकऱ्यांची चोरी किंवा मतचोरी सहन करणार नाही"

"परिस्थिती बदलत आहे. भारतातील तरुणांना हे समजलं आहे की, खरा लढा फक्त नोकऱ्यांसाठी नाही तर मतचोरीच्या विरोधात आहे. कारण जोपर्यंत मतचोरी होईल तोपर्यंत बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढतच राहील. तरुण आता नोकऱ्यांची चोरी किंवा मतचोरी सहन करणार नाहीत. भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाVotingमतदानUnemploymentबेरोजगारीPoliticsराजकारण