शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:12 IST

Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी हे मतचोरीचा मुद्दा सतत उपस्थित करत आहेत. त्यांनी आता मतचोरीचा संबंध बेरोजगारीशी जोडला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे मतचोरीचा मुद्दा सतत उपस्थित करत आहेत. त्यांनी आता मतचोरीचा संबंध बेरोजगारीशी जोडला आहे. बेरोजगारीवरूनभाजपा सरकारवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर तरुण आणि पोलिसांमधील संघर्ष दाखवणारा एक व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडिओमध्ये केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती" असं म्हटलं आहे. 

राहुल यांनी ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भारतातील तरुणांसमोरील सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे आणि त्याचा थेट संबंध मतचोरीशी आहे. जेव्हा एखादं सरकार जनतेचा विश्वास जिंकून सत्तेत येतं तेव्हा त्यांचं पहिलं कर्तव्य म्हणजे तरुणांना रोजगार आणि संधी उपलब्ध करून देणं. परंतु भाजपा प्रामाणिकपणे निवडणुका जिंकत नाही. ते मतं चोरून आणि संस्थांवर नियंत्रण ठेवून सत्तेत राहतात."

"तरुणांचं भविष्य अंधारात ढकललं"

बेरोजगारीवर हल्लाबोल करत राहुल गांधी पुढे म्हणाले, "बेरोजगारी ४५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. म्हणूनच नोकऱ्या कमी होत आहेत, भरती प्रक्रिया कोलमडल्या आहेत आणि तरुणांचं भविष्य अंधारात ढकललं जात आहे. म्हणूनच प्रत्येक परीक्षा पेपर फुटीच्या गोष्टींशी जोडली जाते आणि प्रत्येक भरती भ्रष्टाचाराने भरलेली असते. देशातील तरुण कठोर परिश्रम करतात, स्वप्न पाहतात आणि त्यांच्या भविष्यासाठी संघर्ष करतात. परंतु मोदी केवळ त्यांच्या स्वतःचा जनसंपर्क, सेलिब्रिटींच्या जाहिराती आणि अब्जाधीशांच्या नफ्यावर लक्ष केंद्रित करतात. तरुणांच्या आशा चिरडून टाकणं आणि त्यांना निराश करणं ही या सरकारची ओळख बनली आहे."

"नोकऱ्यांची चोरी किंवा मतचोरी सहन करणार नाही"

"परिस्थिती बदलत आहे. भारतातील तरुणांना हे समजलं आहे की, खरा लढा फक्त नोकऱ्यांसाठी नाही तर मतचोरीच्या विरोधात आहे. कारण जोपर्यंत मतचोरी होईल तोपर्यंत बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढतच राहील. तरुण आता नोकऱ्यांची चोरी किंवा मतचोरी सहन करणार नाहीत. भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाVotingमतदानUnemploymentबेरोजगारीPoliticsराजकारण