शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

काँग्रेसची प्रचारयंत्रणा वाऱ्यावर?, राष्ट्रीय नेत्यांनी फिरविली महाराष्ट्राकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 00:23 IST

येत्या २१ आॅक्टोबरला होणाºया विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू असताना काँग्रेसच्या आघाडीवर मात्र सर्वत्र शांतता दिसत आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा उडालेला असताना काँग्रेस पक्षाच्या एकाही राष्ट्रीय नेत्याची महाराष्ट्रात अद्याप जाहीरसभा झालेली नाही. यामुळे या राष्ट्रीय नेत्यांची ‘पायधूळ’ महाराष्ट्राच्या भूमीला केव्हा लागणार, असा संतप्त सवाल आता काँग्रेसचे कार्यकर्ते करू लागले आहेत.येत्या २१ आॅक्टोबरला होणाºया विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू असताना काँग्रेसच्या आघाडीवर मात्र सर्वत्र शांतता दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून भाजपचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्र ढवळून काढत असताना काँग्रेसचे ‘रार्ष्ट्रीय’ नेते अद्यापही प्रचारासाठी उतरलेले नाहीत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री प्रचारात उतरलेले असताना काँग्रेसचे मैदान मात्र सुनसान आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्याच मतदारसंघात अडकून पडलेले आहेत. काँग्रेसने ४० जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात अनेक राष्ट्रीय नेत्यांचा समावेश आहे.मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद, काँग्रेसचे निवडणूक समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे या राष्ट्रीय नेत्यांचा समावेश आहे. यापैकी एकाही नेत्यांची ‘पायधूळ’ अद्यापही महाराष्ट्राच्या भूमीला लागलेली नाही.गांधी परिवारावर मदारकाँग्रेसची सारी मदार गांधी परिवारावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी व माजी अध्यक्ष राहुल गांधी या तिन्ही नेत्यांच्या येत्या १३ आॅक्टोबरपासून जाहीरसभा महाराष्ट्रात होणार आहेत. यात प्रियंका गांधी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये उतरणार असल्याने अनेक उमेदवारांनी प्रियंका गांधी यांच्या जाहीरसभांची मागणी केली आहे. परंतु अद्याप वेळापत्रक निश्चित झालेले नाही. यासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने केला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019