शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘मंगळसूत्र’वरून प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका; आज्जीची आठवण काढत म्हणाल्या... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 22:02 IST

Congress Priyanka Gandhi News: पंतप्रधान मोदी इतके प्रभावशाली आहेत, तर रोजगार देणे, महागाई कमी करणे, तरुणांसाठी नवीन योजना आणण्यात अपयशी का ठरत आहेत, अशी विचारणा प्रियंका गांधींनी केली.

Congress Priyanka Gandhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मंगळसूत्र’चे महत्त्व कळले असते, तर अशा गोष्टी बोलले नसते. देशात नोटाबंदी केली, तेव्हा महिलांची बचत हिसकावली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात ६०० शेतकऱ्यांनी जीव गमावला, पंतप्रधान मोदी यांनी त्या विधवांच्या मंगळसूत्राचा विचार केला का? मणिपूरमध्ये एका महिलेबाबत जे घडले, तेव्हा नरेंद्र मोदी गप्प होते, त्यांनी तिच्या मंगळसूत्राचा विचार केला का? आता ते महिलांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. महिलांना घाबरवले जात आहेत. जेणेकरून भीतीने महिला मतदान करतील, या शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.

बंगळुरू येथील सभेला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेसवाल्यांना मंगळसूत्र आणि सोने हिसकावून घ्यायचे आहे, अशा गोष्टी गेल्या काही दिवसांपासून पसरवल्या जात आहेत. हा देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली, ५५ वर्षे काँग्रेसचे सरकार होते, मग तुमचे सोने आणि मंगळसूत्र कोणी हिसकावले का? देशाला युद्धाला सामोरे जावे लागले तेव्हा, इंदिरा गांधींनी आपले सोने देशाला दिले होते. माझ्या आईचे मंगळसूत्र (राजीव गांधी) या देशासाठी शहीद झाले, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

गेल्या १० वर्षांत सामान्यांसाठी केंद्र सरकारने काही काम केले नाही हे सत्य आहे

पंतप्रधान मोदींसारख्या देशातील नेत्याने नैतिकता सोडली आहे. लोकांसमोर नाटके सुरू आहेत. सत्याच्या मार्गावर चालत नाही. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकून विरोधकांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या १० वर्षांत केंद्रातील सरकारने कोणतेही काम केलेले नाही हे सत्य आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली. तसेच सत्याच्या मार्गावर चालणे. सामान्यांची सेवा करणे, देशसेवा करणे, ही हिंदू तसेच राजकीय परंपरा आहे. यापूर्वीच्या सर्व पंतप्रधानांनी, त्यांचा पक्ष कोणताही असो, देशाच्या लोकांसाठी त्यागाच्या भावनेने काम केले. खोट्या मोदी सरकारने अन्य राज्यातील सरकारे पाडण्यासाठी सर्व लोकशाही मूल्ये मोडीत काढली. या भाजपाचा निषेध करण्याचे धाडस कोणी करत नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

दरम्यान, भाजपाचे नेते कधीही रोजगार, शिक्षण, आरोग्य यांवर बोलत नाहीत. ते केवळ चिथावणीखोर भाषणे देतात. लोक म्हणतात की, नरेंद्र मोदी हे जगातील सर्वांत महान नेते आहेत. गर्वाने आणि अहंकाराने सांगितले जाते की, नरेंद्र मोदी जगात सुरू असलेली युद्धे क्षणार्धात थांबवू शकतात. मग मला तुम्हाला विचारायचे आहे की, जर ते इतके मोठे नेते असतील, त्यांचा इतका प्रभाव असेल, तर रोजगार निर्माण करण्यात अपयशी का ठरले, महागाई का कमी होऊ शकली नाही. तरुणांसाठी कोणतीही नवीन योजना का आणली नाही आणि तुमच्या कुटुंबात विकास का झाला नाही, असे एकामागून एक प्रश्न प्रियंका गांधींनी केले.

 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४karnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल