शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘मंगळसूत्र’वरून प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका; आज्जीची आठवण काढत म्हणाल्या... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 22:02 IST

Congress Priyanka Gandhi News: पंतप्रधान मोदी इतके प्रभावशाली आहेत, तर रोजगार देणे, महागाई कमी करणे, तरुणांसाठी नवीन योजना आणण्यात अपयशी का ठरत आहेत, अशी विचारणा प्रियंका गांधींनी केली.

Congress Priyanka Gandhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मंगळसूत्र’चे महत्त्व कळले असते, तर अशा गोष्टी बोलले नसते. देशात नोटाबंदी केली, तेव्हा महिलांची बचत हिसकावली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात ६०० शेतकऱ्यांनी जीव गमावला, पंतप्रधान मोदी यांनी त्या विधवांच्या मंगळसूत्राचा विचार केला का? मणिपूरमध्ये एका महिलेबाबत जे घडले, तेव्हा नरेंद्र मोदी गप्प होते, त्यांनी तिच्या मंगळसूत्राचा विचार केला का? आता ते महिलांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. महिलांना घाबरवले जात आहेत. जेणेकरून भीतीने महिला मतदान करतील, या शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.

बंगळुरू येथील सभेला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेसवाल्यांना मंगळसूत्र आणि सोने हिसकावून घ्यायचे आहे, अशा गोष्टी गेल्या काही दिवसांपासून पसरवल्या जात आहेत. हा देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली, ५५ वर्षे काँग्रेसचे सरकार होते, मग तुमचे सोने आणि मंगळसूत्र कोणी हिसकावले का? देशाला युद्धाला सामोरे जावे लागले तेव्हा, इंदिरा गांधींनी आपले सोने देशाला दिले होते. माझ्या आईचे मंगळसूत्र (राजीव गांधी) या देशासाठी शहीद झाले, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

गेल्या १० वर्षांत सामान्यांसाठी केंद्र सरकारने काही काम केले नाही हे सत्य आहे

पंतप्रधान मोदींसारख्या देशातील नेत्याने नैतिकता सोडली आहे. लोकांसमोर नाटके सुरू आहेत. सत्याच्या मार्गावर चालत नाही. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकून विरोधकांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या १० वर्षांत केंद्रातील सरकारने कोणतेही काम केलेले नाही हे सत्य आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली. तसेच सत्याच्या मार्गावर चालणे. सामान्यांची सेवा करणे, देशसेवा करणे, ही हिंदू तसेच राजकीय परंपरा आहे. यापूर्वीच्या सर्व पंतप्रधानांनी, त्यांचा पक्ष कोणताही असो, देशाच्या लोकांसाठी त्यागाच्या भावनेने काम केले. खोट्या मोदी सरकारने अन्य राज्यातील सरकारे पाडण्यासाठी सर्व लोकशाही मूल्ये मोडीत काढली. या भाजपाचा निषेध करण्याचे धाडस कोणी करत नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

दरम्यान, भाजपाचे नेते कधीही रोजगार, शिक्षण, आरोग्य यांवर बोलत नाहीत. ते केवळ चिथावणीखोर भाषणे देतात. लोक म्हणतात की, नरेंद्र मोदी हे जगातील सर्वांत महान नेते आहेत. गर्वाने आणि अहंकाराने सांगितले जाते की, नरेंद्र मोदी जगात सुरू असलेली युद्धे क्षणार्धात थांबवू शकतात. मग मला तुम्हाला विचारायचे आहे की, जर ते इतके मोठे नेते असतील, त्यांचा इतका प्रभाव असेल, तर रोजगार निर्माण करण्यात अपयशी का ठरले, महागाई का कमी होऊ शकली नाही. तरुणांसाठी कोणतीही नवीन योजना का आणली नाही आणि तुमच्या कुटुंबात विकास का झाला नाही, असे एकामागून एक प्रश्न प्रियंका गांधींनी केले.

 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४karnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल