शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
2
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
5
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
6
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
7
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
8
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
9
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
10
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
11
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
12
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
13
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
14
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
15
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
16
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
17
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
18
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
19
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
20
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

‘मंगळसूत्र’वरून प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका; आज्जीची आठवण काढत म्हणाल्या... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 22:02 IST

Congress Priyanka Gandhi News: पंतप्रधान मोदी इतके प्रभावशाली आहेत, तर रोजगार देणे, महागाई कमी करणे, तरुणांसाठी नवीन योजना आणण्यात अपयशी का ठरत आहेत, अशी विचारणा प्रियंका गांधींनी केली.

Congress Priyanka Gandhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मंगळसूत्र’चे महत्त्व कळले असते, तर अशा गोष्टी बोलले नसते. देशात नोटाबंदी केली, तेव्हा महिलांची बचत हिसकावली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात ६०० शेतकऱ्यांनी जीव गमावला, पंतप्रधान मोदी यांनी त्या विधवांच्या मंगळसूत्राचा विचार केला का? मणिपूरमध्ये एका महिलेबाबत जे घडले, तेव्हा नरेंद्र मोदी गप्प होते, त्यांनी तिच्या मंगळसूत्राचा विचार केला का? आता ते महिलांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. महिलांना घाबरवले जात आहेत. जेणेकरून भीतीने महिला मतदान करतील, या शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.

बंगळुरू येथील सभेला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेसवाल्यांना मंगळसूत्र आणि सोने हिसकावून घ्यायचे आहे, अशा गोष्टी गेल्या काही दिवसांपासून पसरवल्या जात आहेत. हा देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली, ५५ वर्षे काँग्रेसचे सरकार होते, मग तुमचे सोने आणि मंगळसूत्र कोणी हिसकावले का? देशाला युद्धाला सामोरे जावे लागले तेव्हा, इंदिरा गांधींनी आपले सोने देशाला दिले होते. माझ्या आईचे मंगळसूत्र (राजीव गांधी) या देशासाठी शहीद झाले, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

गेल्या १० वर्षांत सामान्यांसाठी केंद्र सरकारने काही काम केले नाही हे सत्य आहे

पंतप्रधान मोदींसारख्या देशातील नेत्याने नैतिकता सोडली आहे. लोकांसमोर नाटके सुरू आहेत. सत्याच्या मार्गावर चालत नाही. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकून विरोधकांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या १० वर्षांत केंद्रातील सरकारने कोणतेही काम केलेले नाही हे सत्य आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली. तसेच सत्याच्या मार्गावर चालणे. सामान्यांची सेवा करणे, देशसेवा करणे, ही हिंदू तसेच राजकीय परंपरा आहे. यापूर्वीच्या सर्व पंतप्रधानांनी, त्यांचा पक्ष कोणताही असो, देशाच्या लोकांसाठी त्यागाच्या भावनेने काम केले. खोट्या मोदी सरकारने अन्य राज्यातील सरकारे पाडण्यासाठी सर्व लोकशाही मूल्ये मोडीत काढली. या भाजपाचा निषेध करण्याचे धाडस कोणी करत नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

दरम्यान, भाजपाचे नेते कधीही रोजगार, शिक्षण, आरोग्य यांवर बोलत नाहीत. ते केवळ चिथावणीखोर भाषणे देतात. लोक म्हणतात की, नरेंद्र मोदी हे जगातील सर्वांत महान नेते आहेत. गर्वाने आणि अहंकाराने सांगितले जाते की, नरेंद्र मोदी जगात सुरू असलेली युद्धे क्षणार्धात थांबवू शकतात. मग मला तुम्हाला विचारायचे आहे की, जर ते इतके मोठे नेते असतील, त्यांचा इतका प्रभाव असेल, तर रोजगार निर्माण करण्यात अपयशी का ठरले, महागाई का कमी होऊ शकली नाही. तरुणांसाठी कोणतीही नवीन योजना का आणली नाही आणि तुमच्या कुटुंबात विकास का झाला नाही, असे एकामागून एक प्रश्न प्रियंका गांधींनी केले.

 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४karnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल