शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मुलांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याच्या प्रियंका गांधींच्या गंभीर आरोपांवर सरकारने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 08:59 IST

Congress Priyanka Gandhi : प्रियंका गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. यानंतर आता मुलांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याच्या प्रियंका यांच्या आरोपांवर सरकारने उत्तर दिलं आहे. 

नवी दिल्ली - काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधील सरकारवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केला होता. आपल्या मुलांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याचा दावा केला. तसेच सरकारकडे आता कोणतंच काम नाही आहे का? असं म्हणत निशाणा साधला होता. सध्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीआधी राजकारण तापलं आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. फोन टॅपिंग हे प्रकरण गाजत आहे. याच दरम्यान प्रियंका गांधी यांनी टीकास्त्र सोडलं होतं. यानंतर आता मुलांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याच्या प्रियंका यांच्या आरोपांवर सरकारने उत्तर दिलं आहे. 

सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य पाहता चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक तपासानंतर आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने प्रियंका यांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्या आरोपांची दखल घेण्यात आली. याप्रकरणी, सरकारने स्वत: चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्राथमिक तपासानंतर आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने प्रियंका गांधींचे आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. 

"मुलांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटशी छेडछाड केली गेली नाही"

सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स संसाधन मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये प्राथमिक तपासात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्या मुलांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटशी छेडछाड केली गेली नाही. त्यांनी सरकारवर केलेले आरोप निराधार आणि खोटे असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. प्रियंका यांनी सरकारचं काम काय आहे? तर विकास करणं, लोकांच्या समस्या सोडवणं, अत्याचार रोखणं असं आहे. पण येथे सरकार हे विरोधी पक्षाचे फोन टॅप करण्यात व्यस्त आहे असं म्हटलं होतं. तसेच प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमावर देखील टीका केली होती. 

कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी बलात्काराबाबत बादग्रस्त विधान केलं आहे. सर्वच स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. याच दरम्यान प्रियंका गाधी यांनी देखील यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या चांगल्याच संतापल्या आहेत. "हे अक्षम्य! असं कोणी बोलूच कसं शकतं" असं म्हटलं आहे. के. आर. रमेश कुमार यांनी विधानसभेत महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. 'बलात्कार रोखता येत नसेल तर झोपून राहा आणि त्याचा आनंद घ्या' असं म्हटलं आहे. गंभीर बाब म्हणजे रमेश कुमार यांच्या या विधानावर आक्षेप न घेता विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांनी हसून त्यांना प्रतिसाद दिला.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीInstagramइन्स्टाग्राम