शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

'विचारांच्या लढाईत काही वेळा पूर्ण एकटा पडलो होतो'; राहुल गांधींचा राजीनामा वाचलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 19:21 IST

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सपाटून मार खाल्ला. कोणत्याही नेत्याने पराभवाची जबाबदारी न स्वीकारल्याने खंत व्यक्त केली होती.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सपाटून मार खाल्ला. यामुळे उद्विग्न झालेल्या राहुल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच नवा अध्यक्ष शोधण्यास सांगितले होते. यानंतरही कोणत्याही नेत्याने पराभवाची जबाबदारी न स्वीकारल्याने खंत व्यक्त केली होती. यावेळी देशभरातून अनेक नेत्यांनी राजीनामे पाठविले होते. आज राहुल यांनी मी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, असे सांगत एक पत्रच ट्विटरवर टाकले आहे. तसेच त्यांच्या अकाऊंटवरून काँग्रेस अध्यक्ष पदही काढून टाकले आहे. 

या पत्रात राहुल यांनी लिहिले आहे की, काँग्रेस पक्षासाठी काम करणे माझ्यासाठी सन्मानाचे होते. काँग्रेस पक्षाची विचारधारा नेहमी भारतासारख्या सुंदर देशाची सेवा करण्यासाठी बनलेली आहे. मी पक्षाच्या अध्यक्षांच्या रुपाने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. पक्षाला भविष्यात पुढे जाण्यासाठी या पराभवाची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. यामुळे मी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 

2019 च्या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी अन्य नेत्यांनीही घ्यायला हवी. अशात जर मी अध्यक्ष या नात्याने जबाबदारी स्वीकारली नाही आणि दुसऱ्यांनाच जबाबदार ठरवले तर ते चुकीचे ठरेल. काही सहकाऱ्यांनी सांगितले की, तुम्हीच नव्या अध्यक्षाचे नाव निवडावे. मात्र, हे चुकीचे होईल. आमच्या पक्षाचा जुना इतिहास आहे. कांग्रेस एक विचारधारा असलेला पक्ष आहे आणि मी त्याच्या आदर करतो. यामुळे मला विश्वास आहे की, पक्ष एका चांगल्या नेत्याची निवड करेल जो पूर्णपणे पक्षाला मजबूत नेतृत्व देऊ शकेल. 

यामध्ये लिहिले आहे की, राजीनाम्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकारी समितीला सल्ला दिला आहे. काही लोकांना नव्या अध्यक्ष निवडीची जबाबदारी द्या. मी या कामी त्यांचे पूर्ण सहकार्य करेन. माझा संघर्ष वाया जाणार नाही. भाजपाला मी नेहमी विरोध केला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत करने. हा खासगी विरोध नाही, तर भारताच्या विचारधारेच्या आधारावर आहे. ही कोणती नवी लढाई नाहीय. ही भारताच्या भूमीवर हजारो वर्षांपासून लढली गेली आहे. जेव्हा ते द्वेष आणि घृणास्पद राजकारण करतात तर मी प्रेमाचे राजकारण करतो. ही लढाई आपल्या करोडो भारतीयांची आहे. आपल्या संविधानावरील हल्ला देशाला डळमळीत करण्यासाठी आहे. मी काँग्रेसचा एक विश्वासू सैनिक आहे आणि भारत मातेचा खरा सुपूत्रही. यामुळे देशासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. 

आम्ही चांगल्या मार्गाने लोकसभा निवडणूक लढविली. आरएसएस आणि भाजपाने जेव्हा देशाच्या सार्वभौम संस्थांवर हल्ले करत ताब्यात घेतले त्याविरोधात मी लढलो. कारण मी देशावर प्रेम करतो. या लढाईच्या काळात मी अनेकदा मला एकटा पडल्याचे पाहिले. या काळात मी पक्षाचे सदस्य, महिला आणि कार्यकर्त्यांपासून खूपकाही शिकलो. त्यांची चिकाटी आणि काम करण्याची पध्दत शिकली. 

राहुल यांनी पुढे लिहिले आहे की, ही लढाई पुढे नेण्यासाठी काँग्रेसला नवीन रूप द्यावे लागेल. आज भाजपा भारतीयांचा आवाज दाबत आहे. अशात काँग्रेसला त्यांना सांगण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. भारत कधीही एकसुरी राहिलेला नाही. सर्व सुरांचा समावेश असलेला देश आहे. अखेर सर्व भारतीयांचे आभार मानतो ज्यांनी मला पाठिंबा दिला. मी सदैव देशासाठी, पक्षासाठी हजर असेन. जेव्हा जेव्हा माझा सल्ला मागितला जाईल तेव्हा मी देईन. आपण सत्तेचा मोह सोडल्याशिवाय विचारधारेच्या लढाईत समोरच्यांना हरवू शकत नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा