शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची सुरुवात NRIनं केली, नेहरू, गांधी आणि पटेल होते NRI - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 13:51 IST

काँग्रेसची सुरुवात अनिवासी भारतीयांनी केलेली आहे. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल सर्व अनिवासी भारतीय होते, असे विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केले आहे.

लंडन - 'काँग्रेसची सुरुवात अनिवासी भारतीयांनी केलेली आहे. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल हे सर्व अनिवासी भारतीय होते', असे विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केले आहे.  'या सर्वांनी आधी जग पाहिलं, जगभर घडणाऱ्या घडामोडी, चळवळी पाहिल्या आणि देशाला पुढे नेण्यासाठी योगदान दिले', असेही राहुल गांधींनी यावेळी म्हटले. लंडन येथे 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस'ला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलेले आहे. यावेळेस त्यांनी भाजपावर निशाणार साधला. 'क्रोध आणि द्वेष मिटवण्यासाठीची शक्ती काँग्रेसमध्ये आहे. देशाला अखंड ठेवण्यावर काँग्रेसचा भर आहे, असंही त्यांनी सांगितले.  

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. 'पंतप्रधान मोदी म्हणतात की, मी सत्तेत येण्यापूर्वी देशात काहीच झाले नव्हते. असे बोलून ते भारतीयांची खिल्ली उडवत आहेत. लालकिल्ल्यावरुन त्यांनी म्हटलं की, भारत झोपलेला हत्ती होता, मी त्याला जागं केले आहे. पंतप्रधान मोदींमध्ये किती अहंकार आहे, हे त्यांच्या विधानावरुन दिसून येते. देश केवळ एका व्यक्तीमुळे नाही, तर जनतेमुळे घडला आहे, हे त्यांना समजायला हवे', अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल चढवला. 

(वाचा :काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी नेमल्या तीन महत्त्वाच्या समित्या)

राहुल गांधी पुढे असंही म्हणाले की, गेल्या 70 वर्षात अगदी सर्व काही काँग्रेसने केलेले नाही. पण देशाचा जो काही विकास झालाय त्यात काँग्रेसचाही हातभार आहे. जनतेने हिंमत दाखवली आणि त्या हिमतीला आम्ही मार्ग दाखवला, व देशाला पुढे आणण्यासाठी त्यात भागीदार झालो. काँग्रेस देशाला जोडण्याचं काम करते. पण भाजपाने सत्तेत आल्यानंतर सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि आरबीआयला कमकुवत करण्याचे काम केले आहे, असा घणाघातही त्यांनी केला. 

''लोकांना सांगा... भारताला बदललं जात आहे, एकत्ररित्या पुढे जाण्याची त्याची शक्ती तोडण्याचं काम सुरू आहे. जनतेमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधा'', असा सल्ला यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.  

 

 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू