शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 17:00 IST

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी 'शक्ती'योजनेचा पुनर्विचार करण्याबाबत वक्तव्य केले होते, या विधानावरुन आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.

कर्नाटकमधीलकाँग्रेसच्या सरकारमधील 'शक्ती योजने'बाबत कर्नाटकात गदारोळ सुरु आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सरकार या योजनेचा पुनर्विचार करेल कारण अनेक महिलांनी बसचे भाडे भरण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असं विधान केलं होतं. उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने काँग्रेसवर आरोप सुरू केले आहेत. दरम्यान, आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही कर्नाटक राज्य सरकारवर सडकून टीका केली, 'निवडणुकीच्या काळात अशी कोणतीही आश्वासने देऊ नयेत, जी पूर्ण करता येत नाहीत किंवा ती पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत राज्यावर आर्थिक बोजा पडतो', असे निर्देश खरगे यांनी दिले.

फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान

कर्नाटकातील विधानसभा निवडणूक प्रचारात काँग्रेसने पाच हमीभाव दिले होते. यामध्ये गृहलक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा २,००० रुपये, युवा निधी अंतर्गत दोन वर्षांसाठी बेरोजगार पदवीधरांना  १,५०० रुपये आणि अन्न भाग्य योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक कुटुंबाला प्रति व्यक्ती १० रु. किलोग्राम तांदूळ आणि शक्ती योजनेंतर्गत महिलांसाठी सरकारी बसमध्ये मोफत प्रवास आणि गृह ज्योती योजनेंतर्गत प्रत्येक घराला २०० युनिट मोफत वीजेचा समावेश आहे. पण, आता उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांच्या पुनर्विचार करण्याच्या विधानावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

'शक्ती योजना' काय आहे?

'शक्ती योजना' हा राज्य सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, याअंतर्गत महिलांना राज्यातील सरकारी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. गेल्या वर्षी सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या पाच हमी योजनांपैकी ही एक योजना आहे. ११ जून २०२३ रोजी सरकार सत्तेवर आल्यानंतर एका महिन्याच्या आत हे सुरू करण्यात आले. राज्याने शक्ती योजनेवर १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ३११.०७ कोटी महिलांच्या मोफत प्रवासासाठी ७,५०७.३५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

या योजनेंतर्गत महिलांना सरकारी बसमध्ये प्रवास करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही आणि या योजनेचा उद्देश महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याला चालना देणे हा आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या शिक्षण, नोकरी आणि दैनंदिन कामात अधिक मुक्तपणे सहभागी होता येईल. मात्र, 'शक्ती योजने'बाबत विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. विरोधी पक्ष आणि काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की यामुळे सरकारी अर्थसंकल्पावर जास्त भार पडत आहे आणि त्यामुळे सरकारी संसाधनांचा गैरवापर होऊ शकतो.

योजनेवर पुनर्विचार करण्याचा कोणताही हेतू नाही: मुख्यमंत्री सिद्धरामय्या 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, सरकारसमोर असा कोणताही प्रस्ताव नाही. उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी फक्त काही महिला जे बोलतात तेच सांगितले. सरकारी पातळीवर या योजनेचा पुनर्विचार करण्याचा विचार नाही. असा कोणताही हेतू नाही, असा कोणताही प्रस्ताव नाही.” 

बुधवारी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी दावा केला होता की, अनेक महिलांनी ट्विट आणि ईमेल करून त्यांना बसमध्ये प्रवास करण्यासाठी पैसे देण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यांना प्रवास करायला आवडेल असे सांगितले होते. उपमुख्यमंत्री म्हणाले, सुमारे ५ ते १० टक्के महिला म्हणतात की कंडक्टर तिकिटाचे पैसे घेत नाहीत. मी लवकरच परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यासोबत बैठक घेईन आणि यावर चर्चा करेन.

या वादावर उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी गुरुवारी स्पष्टीकरण देताना सांगितले की, "मी असे कोणतेही विधान दिलेले नाही, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. काही लोक जे श्रीमंत आहेत आणि बसने प्रवास करतात, जसे कर्मचारी, खासगी कंपन्यांचे कर्मचारी, त्यांनी आम्हाला मेल्स पाठवले आहेत.  मी तुम्हाला त्यांचे ट्विट देखील दाखवू शकतो. त्यांच्या कंपन्या त्यांचा वाहतूक खर्च उचलत आहेत. जसे पंतप्रधान मोदींनी गॅस सबसिडी स्वेच्छेने सोडण्याचा पर्याय दिला होता, मी या संदर्भात विचार करण्यास सांगितले होते.

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे