शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

Video: राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'यावेळी भाजप ४०० पार...', पीएम मोदीही हसायला लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 16:48 IST

काल केंद्रीय अर्थसंकल्पानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया आल्या. कर्नाटक काँग्रेसचे नेते डी के सुरेश यांचे एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले. त्यांनी दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविल्याचा गंभीर आरोप केला.

Congress ( Marathi News ) : काल केंद्रीय अर्थसंकल्पानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया आल्या. कर्नाटक काँग्रेसचे नेते डी के सुरेश यांचे एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले. त्यांनी दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविल्याचा गंभीर आरोप केला. तसेच यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करावी लागेल, असं वक्तव्य डी के सुरेश यांनी केले. यावर आता राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. याप्रकरणी आज राज्यसभेत चर्चा झाली. या वक्तव्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 

"...तो त्यांच्यापेक्षाही कट्टर असेल"! PM मोदींनंतर कुणाकडे असेल BJPचं नेतृत्व? PK स्पष्टच बोल

मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत सांगितले की, ''जर कोणी देश तोडण्याचे बोलले तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. तो कोणत्याही पक्षाचा असो. मी स्वत: म्हणेन की कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आम्ही एक आहोत आणि एकच राहू' यावेळी खरगे यांनीही लोकसभा निवडणुकीबाबतही भाष्य केले.यावेळी खरगे यांच्या भाष्याने सभागृहात हशा पिकला. बहुमत तुमचेच असल्याचे खर्गे म्हणाले. आधीच ३३० खासदार आहेत, आता घोषणाबाजी ४०० पारची आहे, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले यावेळी पीएम मोदींनाही हसू आवरले नाही. 

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश यांच्या दक्षिण भारताला वेगळा देश बनवण्याच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. थरूर म्हणाले की, हा संसदेबाहेरचा विषय आहे.

या संपूर्ण प्रकरणावर भाजपने कडक भूमिका घेतली असून केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल या सभागृहातील काँग्रेसचे सदस्य डीके सुरेश यांचे बंधू अर्थसंकल्पावर बोलताना देशाच्या फाळणीबाबत बोलले. काँग्रेस नेत्याने संविधानाचाही अवमान केला आहे. देशाचे विभाजन करण्याची काँग्रेसची परंपरा कायम आहे. यावर काँग्रेसने स्पष्टीकरण देऊन देशाची माफी मागावी. ते या वक्तव्यासोबत आहेत का, हे काँग्रेसने सांगावे, असंही जोशी म्हणाले.

दरम्यान, आता खरगे यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हा व्हिडीओ ट्विट करुन काँग्रेसला टोला लगावला आहे. "विरोधकांनी मान्य केले. तिसऱ्यांदा ४०० पार!, असं ट्विट स्मृती इराणी यांनी केले.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी