शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Video: राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'यावेळी भाजप ४०० पार...', पीएम मोदीही हसायला लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 16:48 IST

काल केंद्रीय अर्थसंकल्पानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया आल्या. कर्नाटक काँग्रेसचे नेते डी के सुरेश यांचे एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले. त्यांनी दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविल्याचा गंभीर आरोप केला.

Congress ( Marathi News ) : काल केंद्रीय अर्थसंकल्पानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया आल्या. कर्नाटक काँग्रेसचे नेते डी के सुरेश यांचे एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले. त्यांनी दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविल्याचा गंभीर आरोप केला. तसेच यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करावी लागेल, असं वक्तव्य डी के सुरेश यांनी केले. यावर आता राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. याप्रकरणी आज राज्यसभेत चर्चा झाली. या वक्तव्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 

"...तो त्यांच्यापेक्षाही कट्टर असेल"! PM मोदींनंतर कुणाकडे असेल BJPचं नेतृत्व? PK स्पष्टच बोल

मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत सांगितले की, ''जर कोणी देश तोडण्याचे बोलले तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. तो कोणत्याही पक्षाचा असो. मी स्वत: म्हणेन की कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आम्ही एक आहोत आणि एकच राहू' यावेळी खरगे यांनीही लोकसभा निवडणुकीबाबतही भाष्य केले.यावेळी खरगे यांच्या भाष्याने सभागृहात हशा पिकला. बहुमत तुमचेच असल्याचे खर्गे म्हणाले. आधीच ३३० खासदार आहेत, आता घोषणाबाजी ४०० पारची आहे, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले यावेळी पीएम मोदींनाही हसू आवरले नाही. 

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश यांच्या दक्षिण भारताला वेगळा देश बनवण्याच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. थरूर म्हणाले की, हा संसदेबाहेरचा विषय आहे.

या संपूर्ण प्रकरणावर भाजपने कडक भूमिका घेतली असून केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल या सभागृहातील काँग्रेसचे सदस्य डीके सुरेश यांचे बंधू अर्थसंकल्पावर बोलताना देशाच्या फाळणीबाबत बोलले. काँग्रेस नेत्याने संविधानाचाही अवमान केला आहे. देशाचे विभाजन करण्याची काँग्रेसची परंपरा कायम आहे. यावर काँग्रेसने स्पष्टीकरण देऊन देशाची माफी मागावी. ते या वक्तव्यासोबत आहेत का, हे काँग्रेसने सांगावे, असंही जोशी म्हणाले.

दरम्यान, आता खरगे यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हा व्हिडीओ ट्विट करुन काँग्रेसला टोला लगावला आहे. "विरोधकांनी मान्य केले. तिसऱ्यांदा ४०० पार!, असं ट्विट स्मृती इराणी यांनी केले.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी