शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 18:10 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वपक्षीय बैठकीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Congress Mallikarjun Kharge: पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ नागरिकांना प्राण गमवावे लागल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत केली जात आहे. विरोधकांनीही या प्रकरणात सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पहलगाम हल्ल्यावरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठे विधान केले आहे. आमच्यासाठी देश प्रथम येतो. धर्म, जात किंवा पक्ष नंतर आहे, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. तसेच खरगे यांनी ५६ इंचाच्या छातीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

जयपूरमधील संविधान वाचवा रॅली दरम्यान मल्लिकार्जुन खरगे बोलत होते. आपण सर्वांनी देशासाठी एकता दाखवली पाहिजे. तसेच मोदी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपस्थित राहायला हवे होते. या हल्ल्यानंतर सरकारने कोणतेही पाऊल उचलले तरी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय हितासाठी त्यांच्यासोबत उभा राहील, असेही काँग्रेस अध्यक्ष यावेळी म्हणाले.

"निष्पाप पर्यटक काश्मीर सुरक्षित आहे, काश्मीर आपले आहे, हे ऐकून देशाच्या कानाकोपऱ्यातून तिथे जातात. तिथे अशी एक वाईट घटना घडली ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला. नंतर, रुग्णालयात असलेल्या ३-४ जणांचाही मृत्यू झाला. हे घडल्यानंतर, मी बंगळुरूहून पत्रकार परिषद घेतली आणि पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावावी असे सांगितले. कारण जेव्हा देशाचा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा आपण सर्वांनी एकजूट राहिले पाहिजे. आमची अशी इच्छा होती की या बैठकीत पंतप्रधानांनी त्यांच्या योजनेबद्दल सांगावे आणि लोकांकडून सूचनाही घ्याव्यात. याशिवाय, आम्ही पक्षाची बैठकही बोलावली, ज्यामध्ये आम्ही सर्वजण सरकारसोबत असल्याचा निर्णय घेण्यात आला होता," असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"आम्ही सरकारला असेही सांगितले की या कठीण काळात, आपण सर्वजण एकत्र येऊ आणि सरकार जे काही पाऊल उचलेल त्याला पाठिंबा देऊ.  पण हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे की सर्व पक्षाचे लोक त्या बैठकीला गेले, पण पंतप्रधान मोदी आले नाहीत. हे लाजिरवाणे आहे. जेव्हा देशाचा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा तुम्ही बिहारमध्ये निवडणुकीसाठी भाषणे देता आणि दिल्लीत येऊ शकत नाही. दिल्ली बिहारपासून लांब आहे का? तुम्ही मोठमोठ्या गोष्टी बोलता. माझ्याकडे ५६ इंचाची छाती आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, मी लढेन, मी घरात घुसेन. अरे बाबा, निदान जर तुम्ही त्या दिवशी बिहारच्या ऐवजी आमच्या बैठकीत आला असतात तर सर्वांना कळले असते की तुमचे नियोजन काय आहे, तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला आमच्याकडून कोणती मदत हवी आहे. सर्व पक्षाचे लोक मदत करायला तयार आहेत, तरीही तुम्ही तिथे लक्ष देण्याचा प्रयत्नही केला नाही. पंतप्रधान आणि भाजपचे हे वागणं आहे," असेही खरगे म्हणाले.

"पंतप्रधान मोदींनी महागाई आणि बेरोजगारी दिली. अशा लोकांनी देशाला कमकुवत केले आहे आणि आता ५६ इंचाची छाती आकुंचन पावली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी म्हणाले होते की विकासाच्या बाबतीत उत्तर प्रदेशचे गुजरातमध्ये रूपांतर करण्यासाठी ५६ इंचाची छाती लागते. जेव्हा जेव्हा काँग्रेस वाढते तेव्हा हे लोक तिला दाबण्याचा प्रयत्न करतात. पण आपण दडपले जाणाऱ्यांमधील नाही," असं खरगेंनी म्हटलं. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस