शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

PM नरेंद्र मोदींवरील 'त्या' विधानावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी व्यक्त केली दिलगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 20:32 IST

माझ्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील. वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला असेल आणि कुणाला दु:ख झाले असेल तर मी त्यासाठी खेद व्यक्त करतो असं काँग्रेस अध्यक्षांनी म्हटलं.

बंगळुरू -  कर्नाटकच्या निवडणूक प्रचारावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर आता मल्लिकार्जुन खरगे यांनी माझ्या विधानावरून जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विषारी साप आहेत असं खरगेंनी म्हटलं होते. 

वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, माझ्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील. वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला असेल आणि कुणाला दु:ख झाले असेल तर मी त्यासाठी खेद व्यक्त करतो. आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात. आरएसएस-भाजपा यांची विचारधारा विषारी आहे. परंतु भाजपाची तुलना पंतप्रधान मोदींची केली असं ते म्हणाले. 

तसेच कुठल्याही व्यक्तीबाबत आणि कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. मी पंतप्रधान मोदी आणि आरएसएसबाबतीत काही बोललो नाही. माझे विचार त्यांच्या विचारधारेहून वेगळे आहेत. कुणावरही वैयक्तिक हल्ला केला नाही. भाजपाची विचारधारा विभाजनवादी, द्वेषपूर्ण, गरीब आणि दलितांप्रती पूर्वग्रहदुषित आहे. मी या विचारधारेवर टीका केली. माझे विधान वैयक्तिक पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा कुठल्याही व्यक्तीसाठी नव्हते असं स्पष्टीकरण खरगेंनी दिले आहे. 

'प्रतिस्पर्ध्यांसाठीही शिष्टाई निभावलीय''पंतप्रधान मोदींसोबत आमची लढाई वैयक्तिक लढाई नाही. ही वैचारिक लढाई आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता आणि नकळत कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर तो माझा हेतू कधीच नव्हता आणि माझ्या प्रदीर्घ राजकीय जीवनाचा तो आचारही नाही. मी नेहमीच मित्र आणि विरोधकांसाठी राजकीय शुद्धतेचे नियम आणि परंपरांचे पालन केले आहे आणि माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते करेन असंही खरगेंनी लिहिलं आहे. 

भाजपाची टीकाकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हुबळी येथे बोलताना म्हटले की, आज काँग्रेस कोणत्या प्रकारचे विष ओकत आहे, हे देश पाहत आहे. काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींवर अपमानास्पद टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा शेरेबाजीने त्यांनी कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित केला आहे. हे शब्द खरगेंचे असतील, पण हे विष गांधी घराण्याचे आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे