शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

“१४७ दिवस झाले, PM मोदींना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही”; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 17:32 IST

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारने संपूर्ण राज्य 'अशांत क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे.

Manipur Violence: गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूर धुमसत आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी बंद असलेली इंटरनेट सेवा पुन्हा बहाल करण्यात आली होती. परंतु, पुन्हा एकदा मणिपूरमधील परिस्थिती चिघळत असल्याचे सांगितले जात आहे. यातच राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. १४७ दिवस झाले. मात्र, अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही, असे सांगत मल्लिकार्जुन खरगे यांनी निशाणा साधला.

मणिपूर सरकारने अधिसूचना काढत सांगितले की, १ ऑक्टोबर २०२३ पासून प्रभावी १० पोलीस स्टेशन्स वगळता मणिपूरमधील संपूर्ण परिसर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. विविध अतिरेकी गटांच्या हिंसक कारवायांमुळे संपूर्ण मणिपूरमध्ये प्रशासनाला मदत करण्यासाठी सशस्त्र दलांची गरज असल्याचे राज्यपालांचे मत आहे. १९ पोलीस स्थानकांचे हद्दी परिसर वळगून अन्य भाग अशांत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली.  

PM मोदींना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही

मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर एक पोस्ट केली असून, यात मणिपूरमधील परिस्थितीवरून केंद्र सरकावर टीका केली आहे. गेल्या १४७ दिवसांपासून मणिपूर धुमसत आहे. पण पंतप्रधान मोदींना राज्याचा दौरा करायला वेळ नाही. या हिंसाचारात विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. यासंदर्भातील जे फोटो समोर येत आहेत, त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आहे. महिला आणि मुलांना हिंसाचारासाठीचे हत्यार बनवले जात असल्याची बाब आता उघड होत आहे. सुंदर राज्य असलेले मणिपूर रणांगण बनले आहे. हे सर्व भाजपमुळे घडत आहे. पंतप्रधान मोदींनी भाजपच्या मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी करायला हवी. पुढील कोणत्याही गोंधळावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पहिले पाऊल असेल, या शब्दांत मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. इम्फाल शहर आणि घाटी परिसरातील भागात विद्यार्थी हिंसक निदर्शने करत आहेत. सुदैवाने आताच्या घडीला तरी हिंसाचाराच्या कोणत्याही मोठ्या घटना घडलेल्या नाहीत, परंतु मणिपूरमध्ये अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे. 

 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदी