शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

“१४७ दिवस झाले, PM मोदींना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही”; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 17:32 IST

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारने संपूर्ण राज्य 'अशांत क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे.

Manipur Violence: गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूर धुमसत आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी बंद असलेली इंटरनेट सेवा पुन्हा बहाल करण्यात आली होती. परंतु, पुन्हा एकदा मणिपूरमधील परिस्थिती चिघळत असल्याचे सांगितले जात आहे. यातच राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. १४७ दिवस झाले. मात्र, अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही, असे सांगत मल्लिकार्जुन खरगे यांनी निशाणा साधला.

मणिपूर सरकारने अधिसूचना काढत सांगितले की, १ ऑक्टोबर २०२३ पासून प्रभावी १० पोलीस स्टेशन्स वगळता मणिपूरमधील संपूर्ण परिसर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. विविध अतिरेकी गटांच्या हिंसक कारवायांमुळे संपूर्ण मणिपूरमध्ये प्रशासनाला मदत करण्यासाठी सशस्त्र दलांची गरज असल्याचे राज्यपालांचे मत आहे. १९ पोलीस स्थानकांचे हद्दी परिसर वळगून अन्य भाग अशांत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली.  

PM मोदींना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही

मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर एक पोस्ट केली असून, यात मणिपूरमधील परिस्थितीवरून केंद्र सरकावर टीका केली आहे. गेल्या १४७ दिवसांपासून मणिपूर धुमसत आहे. पण पंतप्रधान मोदींना राज्याचा दौरा करायला वेळ नाही. या हिंसाचारात विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. यासंदर्भातील जे फोटो समोर येत आहेत, त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आहे. महिला आणि मुलांना हिंसाचारासाठीचे हत्यार बनवले जात असल्याची बाब आता उघड होत आहे. सुंदर राज्य असलेले मणिपूर रणांगण बनले आहे. हे सर्व भाजपमुळे घडत आहे. पंतप्रधान मोदींनी भाजपच्या मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी करायला हवी. पुढील कोणत्याही गोंधळावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पहिले पाऊल असेल, या शब्दांत मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. इम्फाल शहर आणि घाटी परिसरातील भागात विद्यार्थी हिंसक निदर्शने करत आहेत. सुदैवाने आताच्या घडीला तरी हिंसाचाराच्या कोणत्याही मोठ्या घटना घडलेल्या नाहीत, परंतु मणिपूरमध्ये अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे. 

 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदी