शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

“१४७ दिवस झाले, PM मोदींना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही”; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 17:32 IST

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारने संपूर्ण राज्य 'अशांत क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे.

Manipur Violence: गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूर धुमसत आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी बंद असलेली इंटरनेट सेवा पुन्हा बहाल करण्यात आली होती. परंतु, पुन्हा एकदा मणिपूरमधील परिस्थिती चिघळत असल्याचे सांगितले जात आहे. यातच राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. १४७ दिवस झाले. मात्र, अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही, असे सांगत मल्लिकार्जुन खरगे यांनी निशाणा साधला.

मणिपूर सरकारने अधिसूचना काढत सांगितले की, १ ऑक्टोबर २०२३ पासून प्रभावी १० पोलीस स्टेशन्स वगळता मणिपूरमधील संपूर्ण परिसर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. विविध अतिरेकी गटांच्या हिंसक कारवायांमुळे संपूर्ण मणिपूरमध्ये प्रशासनाला मदत करण्यासाठी सशस्त्र दलांची गरज असल्याचे राज्यपालांचे मत आहे. १९ पोलीस स्थानकांचे हद्दी परिसर वळगून अन्य भाग अशांत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली.  

PM मोदींना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही

मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर एक पोस्ट केली असून, यात मणिपूरमधील परिस्थितीवरून केंद्र सरकावर टीका केली आहे. गेल्या १४७ दिवसांपासून मणिपूर धुमसत आहे. पण पंतप्रधान मोदींना राज्याचा दौरा करायला वेळ नाही. या हिंसाचारात विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. यासंदर्भातील जे फोटो समोर येत आहेत, त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आहे. महिला आणि मुलांना हिंसाचारासाठीचे हत्यार बनवले जात असल्याची बाब आता उघड होत आहे. सुंदर राज्य असलेले मणिपूर रणांगण बनले आहे. हे सर्व भाजपमुळे घडत आहे. पंतप्रधान मोदींनी भाजपच्या मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी करायला हवी. पुढील कोणत्याही गोंधळावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पहिले पाऊल असेल, या शब्दांत मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. इम्फाल शहर आणि घाटी परिसरातील भागात विद्यार्थी हिंसक निदर्शने करत आहेत. सुदैवाने आताच्या घडीला तरी हिंसाचाराच्या कोणत्याही मोठ्या घटना घडलेल्या नाहीत, परंतु मणिपूरमध्ये अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे. 

 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदी