शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Congress President Election: 'तुम्ही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का?' शशी थरुर स्पष्टचं बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 15:59 IST

Congress President Election: शशी थरूर काँग्रेसच्या G-23 नेत्यांमध्ये आहेत, ज्यांनी पक्ष नेतृत्वात बदलाची मागणी केली होती.

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार आहे. एकीकडे राहुल गांधी यांनी अध्यक्ष होण्यास नकार दिला आहे तर दुसरीकडे अध्यक्षपदाच्या शर्यतातीत अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. अशातचा तिरुअनंतपूरचे खासदार आणि ज्येष्ठ नेते शशी थरूर(Shashi Tharoor) काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात, असे बोलले जात आहे. या चर्चांवर स्वतः थरुर यांची प्रतिक्रिया आली आहे. 

'मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात'एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीतमध्ये शशी थरूर म्हणाले की, 'मला यावर भाष्य करण्याची गरज नाही. मी माझ्या लेखात जे लिहिले आहे तेच मी सांगेन. काँग्रेस पक्षात निवडणुका झाल्या तर पक्षाचेच भले होईल.' थरूर यांनी 'मातृभूमी' या मल्याळम दैनिकात एक लेख लिहिला आहे, ज्यामध्ये त्यांनी "मुक्त आणि निष्पक्ष" निवडणुकांचे आवाहन केले आहे.

या लेखात त्यांनी म्हटले की, 'पक्षाने काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) डझनभर जागांसाठीही निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत. AICC आणि PCC सदस्यांना पक्षातील या प्रमुख पदांचे नेतृत्व कोण करणार हे निवडण्याची परवानगी दिली पाहिजे.' विशेष म्हणजे, शशी थरूर हेदेखील काँग्रेसच्या G-23 नेत्यांमध्ये आहेत, जे पक्षात संघटनात्मक बदलाची मागणी करत आहेत.

काँग्रेस अध्यक्षाची नितांत गरजथरूर यांनी आपल्या लेखात लिहिले की, "मला अपेक्षा आहे की, अनेक उमेदवार स्वत:चे विचार मांडण्यासाठी पुढे येतील. पक्ष आणि देशासाठी त्यांची दूरदृष्टी मांडल्याने जनहित नक्कीच जागृत होईल. पक्षाला सध्या नूतनीकरणासह एका चांगल्या अध्यक्षाचीही गरज आहे. पक्षाची सद्यस्थिती, भविष्यातील संकट आणि देशातीलचित्र पाहता अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि मतदारांना प्रेरित करण्याची दुहेरी जबाबदारी असेल. पक्षाच्या भावी अध्यक्षाकडे भारतासाठी एक व्हिजन असायला हवे.' 

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक पक्षांतर्गत गटबाजीचा सामना करत असलेल्या काँग्रेसने रविवारी पक्षाध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार असल्याचे जाहीर केले आहे. तर, निकाल 19 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी जारी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 30 सप्टेंबरपर्यंत चालेल. अशी लोकशाही पद्धती पाळणारा हा देशातील एकमेव पक्ष असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPresidentराष्ट्राध्यक्षShashi Tharoorशशी थरूर