शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसनं मला 12 वर्षं छळलं, अमित शहांना तुरुंगात टाकलं; मोदींचा 'भावनिक' हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 19:51 IST

काँग्रेस आणि काँग्रेसच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या व्यवस्थेने सलग 12 वर्ष मला त्रस्त केले, असे मोदी म्हणाले.

ठळक मुद्दे काँग्रेस आणि काँग्रेसच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या व्यवस्थेने सलग 12 वर्ष मला त्रस्त केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांवर भावनिक हल्लाआज देशात काळापैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात कारवाई केली जात आहे. त्यामुळेच देशातील राजकारण बदलत आहे

नवी दिल्ली - भाजपाच्या राष्ट्रीय संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांवर भावनिक हल्ला केला आहे. गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम पाहत असताना काँग्रेस आणि त्यांच्या हितचिंतकांनी, काँग्रेसच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या व्यवस्थेने सलग 12 वर्ष मला त्रस्त केले, असे मोदींनी सांगितले.  भाजपाच्या संमेलनात संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ''मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेस, त्याचे सहकारी, त्यांच्या इशाऱ्यावर चालणारी व्यवस्था, तसेच त्यांच्या रिमोटवर चालणारे नेते आणि अधिकाऱ्यांनी मला हर तऱ्हेने त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांनी मला छळण्याची एकही संधी सोडली नाही.'' ''2007 साली तर काँग्रेसचे एक मोठे नेते गुजरातमध्ये प्रचार सभेला संबोधित करताना म्हणाले होते की, मोदी काही महिन्यांत तुरुंगात जाईल. तर विधानसभेमध्ये काँग्रेसचे नेते भाषण द्यायचे की, मोदींनी तुरुंगात जायची तयारी करावी. आता मुख्यमंत्री आहात तर तुरुंगांचा साफसफाई व्यवस्थित ठेवा कारण तुम्हाला पुढचे जीवन तुरुंगातच काढायचे आहे,'' असे मोदींनी सांगितले.  आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांनी सीबीआयवर घातलेल्या बंदीबाबत बोलताना मोदींनी या निर्णयावर जोरदार टीका केली. ''आता सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निर्णय तुम्ही ऐकलाच असेल. या निर्णयामुळे यूपीए सरकारने मोदींना फसवा, अमित शाह यांना तुरुंगातच टाका, असा अजेंडा राबवला होता, हे  समोर आले आहे. पण आम्ही तेव्हा सीबीआयला गुजरातमध्ये येता येणार नाही, असा नियम बनवला नव्हता. आमच्याकडे सत्ता होती. कायदे कानूनही ठावूक होते. पण आमचा सत्य आणि न्यायावर विश्वास होता.''असा टोला मोदींनी लगावला. देशात काळापैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात कारवाई केली जात आहे. त्यामुळेच देशातील राजकारण बदलत आहे, असा दावाही मोदींनी केला.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण