शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

काँग्रेसनं मला 12 वर्षं छळलं, अमित शहांना तुरुंगात टाकलं; मोदींचा 'भावनिक' हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 19:51 IST

काँग्रेस आणि काँग्रेसच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या व्यवस्थेने सलग 12 वर्ष मला त्रस्त केले, असे मोदी म्हणाले.

ठळक मुद्दे काँग्रेस आणि काँग्रेसच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या व्यवस्थेने सलग 12 वर्ष मला त्रस्त केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांवर भावनिक हल्लाआज देशात काळापैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात कारवाई केली जात आहे. त्यामुळेच देशातील राजकारण बदलत आहे

नवी दिल्ली - भाजपाच्या राष्ट्रीय संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांवर भावनिक हल्ला केला आहे. गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम पाहत असताना काँग्रेस आणि त्यांच्या हितचिंतकांनी, काँग्रेसच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या व्यवस्थेने सलग 12 वर्ष मला त्रस्त केले, असे मोदींनी सांगितले.  भाजपाच्या संमेलनात संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ''मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेस, त्याचे सहकारी, त्यांच्या इशाऱ्यावर चालणारी व्यवस्था, तसेच त्यांच्या रिमोटवर चालणारे नेते आणि अधिकाऱ्यांनी मला हर तऱ्हेने त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांनी मला छळण्याची एकही संधी सोडली नाही.'' ''2007 साली तर काँग्रेसचे एक मोठे नेते गुजरातमध्ये प्रचार सभेला संबोधित करताना म्हणाले होते की, मोदी काही महिन्यांत तुरुंगात जाईल. तर विधानसभेमध्ये काँग्रेसचे नेते भाषण द्यायचे की, मोदींनी तुरुंगात जायची तयारी करावी. आता मुख्यमंत्री आहात तर तुरुंगांचा साफसफाई व्यवस्थित ठेवा कारण तुम्हाला पुढचे जीवन तुरुंगातच काढायचे आहे,'' असे मोदींनी सांगितले.  आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांनी सीबीआयवर घातलेल्या बंदीबाबत बोलताना मोदींनी या निर्णयावर जोरदार टीका केली. ''आता सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निर्णय तुम्ही ऐकलाच असेल. या निर्णयामुळे यूपीए सरकारने मोदींना फसवा, अमित शाह यांना तुरुंगातच टाका, असा अजेंडा राबवला होता, हे  समोर आले आहे. पण आम्ही तेव्हा सीबीआयला गुजरातमध्ये येता येणार नाही, असा नियम बनवला नव्हता. आमच्याकडे सत्ता होती. कायदे कानूनही ठावूक होते. पण आमचा सत्य आणि न्यायावर विश्वास होता.''असा टोला मोदींनी लगावला. देशात काळापैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात कारवाई केली जात आहे. त्यामुळेच देशातील राजकारण बदलत आहे, असा दावाही मोदींनी केला.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण