शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद दिवाळीनंतर राहुल गांधींकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:46 IST

काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी कदाचित दिवाळीनंतर पक्षाध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतील, असे पक्षाचे राजस्थानमधील युवानेते सचिन पायलट यांना वाटते.

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी कदाचित दिवाळीनंतर पक्षाध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतील, असे पक्षाचे राजस्थानमधील युवानेते सचिन पायलट यांना वाटते.‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पायलट म्हणाले की, राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा हाती घ्यावी, अशी पक्षात सर्वसाधारण भावना आधीपासूनच आहे. पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून ते बरेच कामही करत आहेत, पण त्यांची पक्षाध्यक्षपदी बढती यथोचित वेळी व्हावी, असे पक्षाचे मत आहे. आता ती वेळ आली आहे, असे मला वाटते. पक्षात संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. त्या झाल्या की, नवा अध्यक्ष दिवाळीनंतर लगेचच सूत्रे स्वीकारेल, असे वाटते.प्रियंका गांधी यांनीही पक्षात पद स्वीकारून सक्रिय राजकारणात यावे का, असे विचारता पायलट म्हणाल्या, प्रियंका काँग्रेसमध्ये आहेतच.सक्रिय राजकारणात उतरायचे का व केव्हा? याचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. घराणेशाहीचे राजकारण आणि काँग्रेसवर घराणेशाहीचा केला जाणारा आरोप याविषयी ते म्हणाले की, राजकारणात नेत्याचे आडनाव ही अपात्रता ठरू नये. एखाद्या घराण्यातील असण्याचा एका मर्यादेपर्यंत फायदा होऊ शकतो, परंतु शेवटी तुम्ही काम काय व किती करता, लोकांची मने कशी जिंकता, यावरच तुमचे यश अवलंबून आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाºया भाजपामध्येही अनेक नेतेही घराणेशाहीनेच आलेले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.अमेथी दौºयावरून वाद; तारखा बदलण्याच्या सूचनालखनऊ : राहुल गांधी यांनी येत्या४ ते ६ आॅक्टोबर असा अमेथी या आपल्या मतदारसंघाचा दौरा योजला आहे, परंतु त्या वेळी पोलीस व प्रशासन कायदा आणि सुव्यवस्थेच्या कामात व्यग्र राहणार असल्याचे गांधी यांच्या दौºयाच्या तारखा बदलाव्या, असे पत्र जिल्हा प्रशासनाने पक्षाला लिहिले आहे. काँग्रेसने यावर टीका केली. राहुल गांधीयेऊन अडचणीचे मुद्दे सांडतील, म्हणून योगी आदित्यनाथ सरकार त्यांचा दौरा होऊ नये, असा पाहात आहे. जमल्यास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या १० आॅक्टोबरच्या दौºयानंतर राहुल आले तर बरे, असा सरकारचा प्रयत्न दिसतो, असा आरोप पक्षाने केला.सचिन पायलट म्हणाले की, ज्येष्ठांना अडगळीत टाकून, त्यांची मानखंडना करण्याची काँग्रेसची परंपरा नाही. भाजपाचे ‘मार्गदर्शक मंडळ’ ही सर्वात मोठी विडंबना आहे. पक्षात वयाची ठरावीक मर्यादा असू नये. प्रश्न पक्ष नव्या पिढीकडे सोपविण्याचा नाही. ज्येष्ठ व तरुण यांनी एकत्र येऊन काम करणे, नक्कीच गरजेचे आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी