शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जुने पराभव विसरून नव्या जोमाने सुरुवात; बिहार फत्ते करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 21:22 IST

Congress on Bihar Election : या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये निवडणुका होत असून, यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे.

Congress on Bihar Election : मागील काही निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पुन्हा सक्रिय झाली आहे. काँग्रेसने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यंदा काँग्रेसची नजर बिहारमधील दलित व्होटबँकेवर आहे. याच रणनीतीअंतर्गत राहुल गांधींनी या वर्षात आतापर्यंत दोनदा पाटण्याचा दौरा केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या महिन्यात बिहारमध्ये दोन सभा घेणार आहेत. त्यानंतर प्रियंका गांधी मार्चमध्ये कार्यक्रम बिहारला जात आहेत. पक्षाने आपल्या राज्य नेतृत्वालाही निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

खरगेंच्या बॅक टू बॅक सभामल्लिकार्जुन खरगे येत्या 22 फेब्रुवारीला बक्सर येथे सभा घेणार आहेत. तर, त्यानंतर 28 फेब्रुवारीला पश्चिम चंपारणमध्येही खरगेंच्या सभेची तयारी सुरू आहे. खरगेंच्या सभांना जय बापू, जय भीम, जय संविधान अशी नावे देण्यात आली आहेत. याद्वारे काँग्रेसला बिहारमधील दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी राहुल गांधींच्या दोन्ही कार्यक्रमांचा भर फक्त दलित मतदारांवर होता. 

काँग्रेस-राजद युतीमध्ये एकही मोठा दलित नेता नाहीबिहारमधील पासवान समाजातील चिराग पासवान आणि जीतन राम मांझी हे मांझी समाजाचे मोठे नेते असून, दोघेही सध्या एनडीएचा भाग आहेत. या दोन जातींशिवाय बिहारमध्ये दलित समाजाची मोठी संख्या आहे, पण काँग्रेस-राजद युतीमध्ये एकही मोठा दलित नेता नाही. बिहारमध्ये या समाजात शिरकाव करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पण प्रश्न असा पडतो की काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व सतत बिहारचे दौरे का करत आहे? बिहारमध्ये काँग्रेस एकट्याने निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे का?

काँग्रेसला ताकद दाखवायची आहेसूत्रांचे म्हणणे आहे की, काँग्रेस एकट्याने निवडणूक लढवणार नाही, पण काँग्रेसला आरजेडीसोबत जागावाटप करण्यापूर्वी आपली ताकद दाखवायची आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्तर जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी केवळ एकोणीस जागा जिंकता आल्या. काँग्रेसमुळे तेजस्वी मुख्यमंत्री होऊ शकले नाही, असा संदेश गेला होता. अशा स्थितीत यंदा राजद काँग्रेसला चाळीसपेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही. याशिवाय इतर काही पक्षही जागांची मागणी करत आहेत. 

यामुळेच काँग्रेसला बिहारमधील आघाडीत सक्तीच्या आघाडीऐवजी मजबूत भागीदाराची भूमिका बजावायची आहे. आपल्या जागांचा कोटा कायम ठेवण्याबरोबरच काँग्रेस भक्कम जागा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वेळी काँग्रेसला त्यांच्या पसंतीच्या जागा मिळाल्या नाहीत. यावेळी त्यांच्या पसंतीच्या जागा मिळाल्यास कमी जागांवर तडजोड होऊ शकते, असे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच काँग्रेसने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBiharबिहारBJPभाजपा