शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जुने पराभव विसरून नव्या जोमाने सुरुवात; बिहार फत्ते करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 21:22 IST

Congress on Bihar Election : या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये निवडणुका होत असून, यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे.

Congress on Bihar Election : मागील काही निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पुन्हा सक्रिय झाली आहे. काँग्रेसने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यंदा काँग्रेसची नजर बिहारमधील दलित व्होटबँकेवर आहे. याच रणनीतीअंतर्गत राहुल गांधींनी या वर्षात आतापर्यंत दोनदा पाटण्याचा दौरा केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या महिन्यात बिहारमध्ये दोन सभा घेणार आहेत. त्यानंतर प्रियंका गांधी मार्चमध्ये कार्यक्रम बिहारला जात आहेत. पक्षाने आपल्या राज्य नेतृत्वालाही निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

खरगेंच्या बॅक टू बॅक सभामल्लिकार्जुन खरगे येत्या 22 फेब्रुवारीला बक्सर येथे सभा घेणार आहेत. तर, त्यानंतर 28 फेब्रुवारीला पश्चिम चंपारणमध्येही खरगेंच्या सभेची तयारी सुरू आहे. खरगेंच्या सभांना जय बापू, जय भीम, जय संविधान अशी नावे देण्यात आली आहेत. याद्वारे काँग्रेसला बिहारमधील दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी राहुल गांधींच्या दोन्ही कार्यक्रमांचा भर फक्त दलित मतदारांवर होता. 

काँग्रेस-राजद युतीमध्ये एकही मोठा दलित नेता नाहीबिहारमधील पासवान समाजातील चिराग पासवान आणि जीतन राम मांझी हे मांझी समाजाचे मोठे नेते असून, दोघेही सध्या एनडीएचा भाग आहेत. या दोन जातींशिवाय बिहारमध्ये दलित समाजाची मोठी संख्या आहे, पण काँग्रेस-राजद युतीमध्ये एकही मोठा दलित नेता नाही. बिहारमध्ये या समाजात शिरकाव करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पण प्रश्न असा पडतो की काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व सतत बिहारचे दौरे का करत आहे? बिहारमध्ये काँग्रेस एकट्याने निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे का?

काँग्रेसला ताकद दाखवायची आहेसूत्रांचे म्हणणे आहे की, काँग्रेस एकट्याने निवडणूक लढवणार नाही, पण काँग्रेसला आरजेडीसोबत जागावाटप करण्यापूर्वी आपली ताकद दाखवायची आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्तर जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी केवळ एकोणीस जागा जिंकता आल्या. काँग्रेसमुळे तेजस्वी मुख्यमंत्री होऊ शकले नाही, असा संदेश गेला होता. अशा स्थितीत यंदा राजद काँग्रेसला चाळीसपेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही. याशिवाय इतर काही पक्षही जागांची मागणी करत आहेत. 

यामुळेच काँग्रेसला बिहारमधील आघाडीत सक्तीच्या आघाडीऐवजी मजबूत भागीदाराची भूमिका बजावायची आहे. आपल्या जागांचा कोटा कायम ठेवण्याबरोबरच काँग्रेस भक्कम जागा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वेळी काँग्रेसला त्यांच्या पसंतीच्या जागा मिळाल्या नाहीत. यावेळी त्यांच्या पसंतीच्या जागा मिळाल्यास कमी जागांवर तडजोड होऊ शकते, असे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच काँग्रेसने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBiharबिहारBJPभाजपा