शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

गोडसे भक्तांसाठी अच्छे दिन; प्रज्ञा सिंह यांच्या निवडीवरून काँग्रेसचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 13:12 IST

प्रज्ञा सिंह यांच्या संरक्षण मंत्रालय समितीतील निवडीवरून काँग्रेसचा टोला

ठळक मुद्देप्रज्ञा सिंह यांच्या संरक्षण मंत्रालय समितीतील निवडीवरून काँग्रेसचा टोलासंरक्षण खात्याच्या समितीत प्रज्ञा सिंह यांना स्थान देण्याचा निर्णय दूर्दैवी असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. नथुराम गोडसेच्या भक्तांचे चांगले दिवस आल्याचा टोलाही काँग्रेसच्या एका नेत्याने लगावला

नवी दिल्ली - भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या समितीत ठाकूर यांना स्थान देण्यात आले असून या समितेचे नेतृत्त्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळेंसोबत संरक्षण खात्याच्या समितीत प्रज्ञा सिंह यांना स्थान देण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या या समितीत एकूण 21 सदस्य आहेत. वादग्रस्त वक्तव्य करुन प्रज्ञा सिंह नेहमीच चर्चेत असतात. समितीत स्थान दिल्यामुळे काँग्रेसनेभाजपावर निशाणा साधला आहे. 

संरक्षण खात्याच्या समितीत प्रज्ञा सिंह यांना स्थान देण्याचा निर्णय दूर्दैवी असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. कमलनाथ सरकारचे मंत्री पीसी शर्मा यांनी भाजपा जसं बोलतो तसं वागत नाही. पंतप्रधानांनी प्रज्ञा सिंह यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं म्हटलं होतं. मात्र अद्याप असं काही झालेलं नाही असं म्हणत भाजपावर टीका केली आहे. नथुराम गोडसेच्या भक्तांचे चांगले दिवस आल्याचा टोलाही काँग्रेसच्या एका नेत्याने लगावला आहे. 

काँग्रेसचे नेते जयवीर शेरगिल यांनी भाजपा सरकारने राष्ट्रवादाचं नवं मॉडल दिलं आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्ञा सिंह यांना माफ केलं जाणार नाही असं म्हटलं होतं. मात्र आता गोडसे भक्तांसाठी अच्छे दिन आल्याचं म्हटलं आहे. शेरगिल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर प्रज्ञा सिंह यांच्या संरक्षण मंत्रालय समितीतील निवडीवरून टोला लगावला आहे. तसेच काँग्रेसने ही ट्विट करून भाजपावर हल्लाबोल केला आहे. 

संरक्षण खात्याच्या समितीत अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा या नेत्यांचा समावेश आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर या नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन वाद निर्माण करत असतात. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधीबाबत ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपुत्र म्हटलं होतं. 

प्रज्ञा सिंह या 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारातील आरोपी असून त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्ञा सिंह यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता. मी त्यांना राष्ट्रवादी मानते, असे त्या म्हणाल्या होत्या. 26/11 हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे माझ्या शापाने मरण पावले, असे देखील त्या म्हणाल्या होत्या. या दोन्ही विधानांमुळे ठाकूर यांनी पक्षाला अडचणीत आणले होते.  

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीNathuram Godseनथुराम गोडसे