शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

"पंजाबमध्ये जंगलराज आणि अराजकता"; नवज्योत सिंग सिंद्धूंचा AAP वर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:46 IST

पंजाब काँग्रेसचे (Punjab Congress) माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पुन्हा एकदा 'आप'च्या नवनिर्वाचित सरकारवर निशाणा साधला आहे. 

पंजाब काँग्रेसचे (Punjab Congress) माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पुन्हा एकदा भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखालील 'आप'च्या नवनिर्वाचित सरकारवर निशाणा साधला आहे. सोमवारी त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आम आदमी पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली. "या ठिकाणी जंगलराज आहे. पंजाबमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिकट आहे. या ठिकाणी कोणलाच कायद्याचा धाक नाही," असं सिद्धू म्हणाले.

काँग्रेस कार्यकर्त्याच्या कथित हत्येप्रकरणी कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी सिद्धू लुधियानाला पोहोचले होते. तेव्हा त्यांनी पंजाबच्या आम आदमी पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली. "मी पंजाबमध्ये अशी अराजकता यापूर्वी कधीही पाहिली नाही. कोणालाही कायद्यचा धाक नाही. हे जंगलराज आहे. दिवसाधवळ्या हत्या केल्या जात आहेत," असं सिद्धू म्हणाले. 

"ज्यांनी लोकांना उत्तर दिलं पाहिजे असे लोक गुजरातमध्ये आहेत. पंजाबच्या लोकांवर दररोज हल्ले होत आहेत. गुरुदासपूरमध्ये चार जणांची हत्या करण्यात आली. लुधियानामध्येही हत्या झाली होती. संपूर्ण साज्यात अशा घटना घडत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे," असं म्हणत त्यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

जर हे दिल्लीत घडलं असतं तर...सानौरमध्ये एका काँग्रेस नेत्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा दावा करत सिद्धू यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. "तुमच्या जीवाला धोका आहे असं सांगत तुमचे लोक दिल्लीत न्यायालयात जात आहेत. पंजाबमधील लोकांच्या जीवाचीही काळजी करा. जर दे दिल्लीत घडलं असतं तर तुम्ही याला गुंडगिरी म्हटलं असतं. आता पाहा पंजाबमध्ये काय होतंय पाहा. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे," असंही सिद्धू ट्वीट करत म्हणाले होते.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मानArvind Kejriwalअरविंद केजरीवाल