शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपविरोधी आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेसच आवश्यक; कपिल सिब्बल यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 06:38 IST

२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपशी दोन हात करणाऱ्या कोणत्याही आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेस असणे आवश्यक आहे

नवी दिल्ली :

२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपशी दोन हात करणाऱ्या कोणत्याही आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेस असणे आवश्यक आहे, असे राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी रविवारी म्हटले. केंद्रातील भाजपप्रणीत सरकारला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना सर्वांत आधी एक समान व्यासपीठ शोधण्याचे आवाहन त्यांनी केले. हे सामायिक व्यासपीठ आपण नव्याने स्थापन केलेला ‘इन्साफ’ हा मंचही असू शकतो, असे ते म्हणाले.

विरोधी आघाडीच्या नेतृत्वाच्या मुद्द्याचे उत्तर या टप्प्यावर देण्याची गरज नाही, असे सांगताना त्यांनी २००४ चे उदाहरणही दिले. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकार सत्तेतून बाहेर फेकले गेले होते. तेव्हाही पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित नव्हता, असे ते म्हणाले. विरोधी पक्षांच्या कोणत्याही युतीत काँग्रेस केंद्रस्थानी व आघाडीवर असणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.

सिब्बल म्हणाले...- आपल्याला राहुल गांधींना एखाद्या व्यक्तीबद्दल एक विचार व्यक्त करण्यास आणि शरद पवारांना त्यांचा दृष्टिकोन ठेवण्याची परवानगी द्यायला हवी. हे मतभेदाचे उदाहरण नसावे.- विरोधकांची एकजूट तेव्हाच होईल जेव्हा आमचे व्यापक एकमत असेल. - सरकारच्या हुकुमांमुळे देशात मोठ्या प्रमाणात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अन्याय होत आहेत. त्यामुळे अन्यायाविरुद्धचा लढा उभारण्यासाठी एक समान व्यासपीठ हवे.- जोपर्यंत विरोधी एकजुटीचा प्रश्न आहे, तर हे पहिले पाऊल आहे. राजकीय पक्षांनी एकमेकांसाठी अधिक मोकळेपणाची भावना देण्याची गरज आहे.- विरोधी पक्षांसाठी किमान समान कार्यक्रम हे कठीण काम आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच याचा निर्णय घेतला जाईल.- भाजपमध्ये दाखल झालेल्यांविरोधात सुरू असलेली चौकशी का थांबवली, असा सवालही त्यांनी पंतप्रधानांना केला. सिब्बल म्हणाले, ‘भारताचा नकाशा दोन भागात का विभागला गेला आहे, जिथे भाजपशासित राज्ये आहेत तिथे सीबीआयला प्रवेश नाही, तर विरोधी शासित राज्यांमध्ये त्यांना पूर्ण प्रवेश आहे.’

मुद्दे संकुचित केले की मतभेद होतातराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अदानी समूहाला पाठिंबा देणाऱ्या विधानाने विरोधी ऐक्याला धक्का बसला आहे का, असे विचारले असता, सिब्बल म्हणाले की, ‘जर तुम्ही मुद्दे संकुचित केले तर राजकीय पक्षांमध्ये मतभेद होतील. तुमच्याकडे एक असा सहयोगी मंच आहे जो मुद्द्यांना संकुचित करत नाही, तर सहमती होण्याची शक्यता अधिक असेल.’

भाजप सोयीचे राजकारण करतेतेलंगणामधील घराणेशाहीच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रत्युत्तर देताना, सिब्बल यांनी भाजप ‘सोयीचं राजकारण’ करत असल्याचा आरोप केला. भ्रष्टाचार आणि घराणेशाही हातात हात घालून चालतात, असे ट्वीट सिब्बल यांनी केले आहे. पंजाबमध्ये (अकालींसोबत), आंध्र प्रदेश (जगनसोबत), हरियाणा (चौटाला कुटुंबाशी), जम्मू-काश्मीर (मुफ्ती कुटुंबाशी) आणि महाराष्ट्रात (ठाकरे कुटुंबाशी) भाजपने का हातमिळवणी केली, असा सवाल त्यांनी केला. जेव्हा भाजपने त्यांच्याशी हातमिळवणी केली तेव्हा वंशवाद नव्हता का, यालाच सोयीचे राजकारण म्हणतात, असे सिब्बल यांनी म्हटले.

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बल