शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

“BJP देशात इतका तिरस्कार का पसरवते?”; राहुल गांधींचा सवाल, लालू प्रसाद यादवांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 15:23 IST

Rahul Gandhi And Lalu Prasad Yadav: या भेटीत लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधी यांना एक सल्ला दिला. नेमकी काय चर्चा झाली? जाणून घ्या...

Rahul Gandhi And Lalu Prasad Yadav: भाजपला तगडी टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडी सज्ज झाली आहे. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. यामध्ये सर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकजुटीने लढण्यावर भर देण्यात आला. तसेच जागावाटपावर चर्चा झाल्याचे समजते. यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राजद नेते लालू प्रसाद यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी काही प्रश्न विचारले. त्याला लालू प्रसाद यादव यांनी उत्तरे दिली. 

राहुल गांधी यांनी यादव कुटुंबाकडून जाणून घेतलं की लालूप्रसाद यादव कसे आहेत? झटकेबाज पाणीपुरीचा आस्वादही घेतला. दोन बडे नेते भेटल्यानंतर ज्या औपचारीक आणि अनौपचारीक गप्पा होतात त्या झाल्या. इंडिया आघाडीचे राजद आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. मुंबईतली बैठक पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी गेले होते. 

BJP देशात इतका तिरस्कार का पसरवते?

राहुल गांधींनी लालूप्रसाद यादव यांना भाजपाविषयी प्रश्न विचारले. त्यावर लालूप्रसाद यादव यांनी उत्तर दिले आहे. भाजपावाले तिरस्कार का पसरवतात, असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. यावर, भाजपाला सत्तेची भूक प्रचंड आहे. त्यातूनच तिरस्काराचे राजकारण केले जाते, असे लालू प्रसाद यादव म्हणाले. जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा तिरस्काराचे राजकारण केले जात नाही आणि अर्थव्यवस्था बिघडली की हे राजकारण केले जाते असे तुम्हाला वाटते का? असे राहुल गांधींनी विचारले. यावर उत्तर देताना लालू प्रसाद म्हणाले की, हे अगदी खरे आहे. हे लोक इतका दुष्प्रचार करतात, इतके ब्रेनवॉश करतात की लोकांची मते बदलून जातात.

दरम्यान, लालूजी तुम्हाला हे वाटते का या मागे भाजपाचा उद्देश लोकांचे पैसे लुटणे असतो, असा सवाल राहुल गांधींनी केला. यावर, अत्यंत स्वच्छपणे हेच लक्ष्य असते. त्यामुळेच गरिबांची घरे जाळली जातात, त्यांना त्रास दिला जातो. कट करण्याचे राजकारण भाजप कायमच करत आले आहे, असे सांगत लालू प्रसाद यादव यांनी टीका केली. माझा सल्ला तुम्हाला हा आहे की, तुमचे आई वडील, आजी-आजोबा यांनी जे देशाला नवी दिशा दाखवली, चांगल्या मार्गावर नेले ते विसरु नका. विकासाचे राजकारण करा. देशातील तिरस्कार संपववणे खूप आवश्यक आहे, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण