शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

'महाराष्ट्राचा विकास होत असताना भाजपाचे नेते 'शाखां'मध्ये होते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 17:52 IST

महाराष्ट्राचा विकास होत असताना भाजपाचे आजचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये लाठ्या-काठ्या फिरवित होते, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार हुसैन दलवाई यांनी लगावला आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्राचा विकास होत असताना भाजपाचे आजचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये लाठ्या-काठ्या फिरवित होते, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार हुसैन दलवाई यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही, असा आरोप भाजपाचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. यावरून महाराष्ट्रात वाद सुरू झाला आहे. छाननी समितीच्या बैठकीसाठी हजर राहिल्यानंतर या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार हुसैन दलवाई म्हणाले, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने या राज्याची बांधणी राज्यातील नेत्यांनी अत्यंत धोरणीपणाने केली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. यामागे केवळ एका राज्याची निर्मिती नव्हती तर पुरोगामी व विकासशील महाराष्ट्र घडविण्याचा दृढसंकल्प करून ते आले होते. 

हाच वारसा पुढे वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख यांनी चालविला. या नेत्यांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्र हे देशातील अव्वल राज्य घडले आहे. महाराष्ट्राने सर्व क्षेत्रात प्रगती केली. हे गेल्या पाच वर्षातील देण नाही. महाराष्ट्र विकासाची एक एक पल्ला गाठत होता, त्यावेळी आजचे भाजपचे नेते संघ शाखांमध्ये लाठ्या-काठ्या फिरवित होते. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास कसा झाला, याची माहिती या नेत्यांना नाही, असा टोला त्यांनी हाणला.

 

टॅग्स :Hussein Dalwaiहुसेन दलवाईcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMaharashtraमहाराष्ट्र