शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्राचा विकास होत असताना भाजपाचे नेते 'शाखां'मध्ये होते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 17:52 IST

महाराष्ट्राचा विकास होत असताना भाजपाचे आजचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये लाठ्या-काठ्या फिरवित होते, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार हुसैन दलवाई यांनी लगावला आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्राचा विकास होत असताना भाजपाचे आजचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये लाठ्या-काठ्या फिरवित होते, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार हुसैन दलवाई यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही, असा आरोप भाजपाचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. यावरून महाराष्ट्रात वाद सुरू झाला आहे. छाननी समितीच्या बैठकीसाठी हजर राहिल्यानंतर या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार हुसैन दलवाई म्हणाले, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने या राज्याची बांधणी राज्यातील नेत्यांनी अत्यंत धोरणीपणाने केली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. यामागे केवळ एका राज्याची निर्मिती नव्हती तर पुरोगामी व विकासशील महाराष्ट्र घडविण्याचा दृढसंकल्प करून ते आले होते. 

हाच वारसा पुढे वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख यांनी चालविला. या नेत्यांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्र हे देशातील अव्वल राज्य घडले आहे. महाराष्ट्राने सर्व क्षेत्रात प्रगती केली. हे गेल्या पाच वर्षातील देण नाही. महाराष्ट्र विकासाची एक एक पल्ला गाठत होता, त्यावेळी आजचे भाजपचे नेते संघ शाखांमध्ये लाठ्या-काठ्या फिरवित होते. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास कसा झाला, याची माहिती या नेत्यांना नाही, असा टोला त्यांनी हाणला.

 

टॅग्स :Hussein Dalwaiहुसेन दलवाईcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMaharashtraमहाराष्ट्र