शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला सापडला निवडणूक विजयाचा मंत्र; भाजपाला खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 11:54 IST

झारखंड, हरयाणा, महाराष्ट्रातील कामगिरीवरुन भाजपाचा समाचार

गुवाहाटी: झारखंडमधील खराब कामगिरीवरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळेच भाजपाला झारखंडमध्ये पराभव पत्कारावा लागल्याचं आझाद यांनी म्हटलं. महाराष्ट्र, हरयाणातील विधानसभा निवडणुकांमध्येदेखील भाजपाची कामगिरी ढासळली. कारण या निवडणुकांच्या आधी मोदी सरकारनं काश्मीरमधून कलम ३७० काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता, असं आझाद म्हणाले. तुम्ही जितकी वादग्रस्त विधेयक आणाल, तितक्या जास्त जागा गमवाल, अशा शब्दांत आझाद यांनी भाजपाच्या निवडणुकीतील कामगिरीवर टोलेबाजी केली. भाजपानं महाराष्ट्र, हरयाणातील निवडणुकीच्या महिनाभर आधी काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. यानंतर हरयाणात त्यांना इकडून तिकडून आमदारांची जुळवाजुळव करुन सत्ता राखावी लागली. यानंतर त्यांनी देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी देशभरात लागू करण्याची विधानं केली. त्यामुळे त्यांनी झारखंड गमावलं. आता दिल्लीतही ते पराभूत होतील, असं आझाद म्हणाले. ते गुवाहाटीत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना दिलेली आश्वासनं पूर्ण करत नसल्याचंदेखील आझाद यांनी सांगितलं. '२०१४ च्या निवडणुकीपूर्वी मोदींनी काळा पैसा भारतात आणण्याचं, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र काळा पैसा भारतात आलाच नाही. रोजगार देण्यात, महागाई करण्यातदेखील ते अपयशी ठरले. उलट मोदींच्या कार्यकाळात पेट्रोल, डिझेल, एलपीजीच्या किमती वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं. मात्र कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहेत,' अशा शब्दांत आझाद यांनी मोदींच्या आश्वासनांचा समाचार घेतला.  

टॅग्स :JharkhandझारखंडNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रHaryanaहरयाणा