शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

काँग्रेसला सापडला निवडणूक विजयाचा मंत्र; भाजपाला खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 11:54 IST

झारखंड, हरयाणा, महाराष्ट्रातील कामगिरीवरुन भाजपाचा समाचार

गुवाहाटी: झारखंडमधील खराब कामगिरीवरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळेच भाजपाला झारखंडमध्ये पराभव पत्कारावा लागल्याचं आझाद यांनी म्हटलं. महाराष्ट्र, हरयाणातील विधानसभा निवडणुकांमध्येदेखील भाजपाची कामगिरी ढासळली. कारण या निवडणुकांच्या आधी मोदी सरकारनं काश्मीरमधून कलम ३७० काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता, असं आझाद म्हणाले. तुम्ही जितकी वादग्रस्त विधेयक आणाल, तितक्या जास्त जागा गमवाल, अशा शब्दांत आझाद यांनी भाजपाच्या निवडणुकीतील कामगिरीवर टोलेबाजी केली. भाजपानं महाराष्ट्र, हरयाणातील निवडणुकीच्या महिनाभर आधी काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. यानंतर हरयाणात त्यांना इकडून तिकडून आमदारांची जुळवाजुळव करुन सत्ता राखावी लागली. यानंतर त्यांनी देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी देशभरात लागू करण्याची विधानं केली. त्यामुळे त्यांनी झारखंड गमावलं. आता दिल्लीतही ते पराभूत होतील, असं आझाद म्हणाले. ते गुवाहाटीत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना दिलेली आश्वासनं पूर्ण करत नसल्याचंदेखील आझाद यांनी सांगितलं. '२०१४ च्या निवडणुकीपूर्वी मोदींनी काळा पैसा भारतात आणण्याचं, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र काळा पैसा भारतात आलाच नाही. रोजगार देण्यात, महागाई करण्यातदेखील ते अपयशी ठरले. उलट मोदींच्या कार्यकाळात पेट्रोल, डिझेल, एलपीजीच्या किमती वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं. मात्र कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहेत,' अशा शब्दांत आझाद यांनी मोदींच्या आश्वासनांचा समाचार घेतला.  

टॅग्स :JharkhandझारखंडNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रHaryanaहरयाणा