शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

एकही मंत्री कामाचा नाही, हे तर भ्रष्ट सरकार; काँग्रेस आमदाराचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 08:21 IST

भाजपानं आमिष दिल्याचा आरोप काँग्रेस आमदारानं फेटाळला

ठळक मुद्देदोनदा निवडून येऊनही पक्षानं दुर्लक्ष केलं; आमदारानं व्यक्त केली नाराजीकाँग्रेस आघाडीतले तीन आमदार अद्याप बेपत्ताकाँग्रेस सरकारला पाठिंबा देणाऱ्या बसपा आमदारही आक्रमक

भोपाळ: मध्य प्रदेशातल्या एका काँग्रेस आमदारानं विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे. मंगळवार रात्री काँग्रेस आघाडीतले दहा आमदार बेपत्ता झाले होते. मात्र यातले चार आमदार कालपर्यंत परतले नव्हते. त्यातले एक आमदार हरदीप सिंग डंग यांनी काल रात्री विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांच्याकडे राजीनामा पाठवला. दोनदा जनादेश मिळूनही पक्षानं सतत दुर्लक्ष केल्याचं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'एकही मंत्री काम करायला तयार नाही. कारण ते एका भ्रष्ट सरकारचा भाग आहेत,' असं सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे. मध्य प्रदेशात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. मंगळवारी रात्री अचानक काँग्रेस आघाडीतले १० आमदार दिल्लीला रवाना झाले. त्यातले ६ आमदार माघारी परतल्याची माहिती काँग्रेसनं दिली. तर ४ आमदारांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. यापैकी सुवासरा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हरदीप सिंग डंग यांनी काल राजीनामा दिला. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सिंग यांनी आपल्याला भाजपानं ओलीस ठेवल्याचा आरोप फेटाळून लावला. भाजपानं आपल्या आमदारांना ओलीस ठेवल्याचा आणि त्यांना पैशाचं आमिष दाखवल्याचा आरोप याआधी काँग्रेसनं केला होता. आमदार हरदीप सिंग डंग यांनी त्यांचा राजीनामा विधानसभा सचिवालय आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. मात्र डंग यांचा राजीनामा आपल्याला मिळाला नसल्याचं मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितलं. सिंग यांच्यासोबत बेपत्ता झालेले तीन आमदार अद्याप परतलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. डंग यांच्याप्रमाणेच आमदार रमाबाई यांनीदेखील भाजपानं आमिष दिल्याचा आरोप फेटाळला आहे. भाजपानं मला दिल्लीला नेलं या दाव्यात कोणतंही तथ्य नाही. मी स्वत:हून दिल्लीला गेले. माझ्या मुलीनं आधीच माझं विमान तिकीट काढलं होतं. मला मारहाण करण्यात आल्याचा आरोपही चुकीचा आहे. कोणीही मला हात लावण्याची हिंमत करू शकत नाही. मग ती काँग्रेस असो वा भाजपा, असं बसपाच्या आमदार रमाबाई यांनी सांगितलं. विधानसभेतलं पक्षीय बलाबल किती?मध्य प्रदेश विधानसभेत एकूण २३० आमदार निवडून जातात. मात्र दोन आमदारांच्या निधनामुळे सध्या विधानसभेतल्या आमदारांची संख्या २२८ आहे. कालपर्यंत विधानसभेत काँग्रेसचे ११५ आमदार होते. मात्र सिंग यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस आमदारांची संख्या ११४ झाली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या १०७ इतकी आहे. समाजवादी पार्टीच्या दोन आमदारांसह चार अपक्ष आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. यातला एक आमदार अद्याप बेपत्ता आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा