शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एकही मंत्री कामाचा नाही, हे तर भ्रष्ट सरकार; काँग्रेस आमदाराचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 08:21 IST

भाजपानं आमिष दिल्याचा आरोप काँग्रेस आमदारानं फेटाळला

ठळक मुद्देदोनदा निवडून येऊनही पक्षानं दुर्लक्ष केलं; आमदारानं व्यक्त केली नाराजीकाँग्रेस आघाडीतले तीन आमदार अद्याप बेपत्ताकाँग्रेस सरकारला पाठिंबा देणाऱ्या बसपा आमदारही आक्रमक

भोपाळ: मध्य प्रदेशातल्या एका काँग्रेस आमदारानं विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे. मंगळवार रात्री काँग्रेस आघाडीतले दहा आमदार बेपत्ता झाले होते. मात्र यातले चार आमदार कालपर्यंत परतले नव्हते. त्यातले एक आमदार हरदीप सिंग डंग यांनी काल रात्री विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांच्याकडे राजीनामा पाठवला. दोनदा जनादेश मिळूनही पक्षानं सतत दुर्लक्ष केल्याचं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'एकही मंत्री काम करायला तयार नाही. कारण ते एका भ्रष्ट सरकारचा भाग आहेत,' असं सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे. मध्य प्रदेशात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. मंगळवारी रात्री अचानक काँग्रेस आघाडीतले १० आमदार दिल्लीला रवाना झाले. त्यातले ६ आमदार माघारी परतल्याची माहिती काँग्रेसनं दिली. तर ४ आमदारांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. यापैकी सुवासरा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हरदीप सिंग डंग यांनी काल राजीनामा दिला. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सिंग यांनी आपल्याला भाजपानं ओलीस ठेवल्याचा आरोप फेटाळून लावला. भाजपानं आपल्या आमदारांना ओलीस ठेवल्याचा आणि त्यांना पैशाचं आमिष दाखवल्याचा आरोप याआधी काँग्रेसनं केला होता. आमदार हरदीप सिंग डंग यांनी त्यांचा राजीनामा विधानसभा सचिवालय आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. मात्र डंग यांचा राजीनामा आपल्याला मिळाला नसल्याचं मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितलं. सिंग यांच्यासोबत बेपत्ता झालेले तीन आमदार अद्याप परतलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. डंग यांच्याप्रमाणेच आमदार रमाबाई यांनीदेखील भाजपानं आमिष दिल्याचा आरोप फेटाळला आहे. भाजपानं मला दिल्लीला नेलं या दाव्यात कोणतंही तथ्य नाही. मी स्वत:हून दिल्लीला गेले. माझ्या मुलीनं आधीच माझं विमान तिकीट काढलं होतं. मला मारहाण करण्यात आल्याचा आरोपही चुकीचा आहे. कोणीही मला हात लावण्याची हिंमत करू शकत नाही. मग ती काँग्रेस असो वा भाजपा, असं बसपाच्या आमदार रमाबाई यांनी सांगितलं. विधानसभेतलं पक्षीय बलाबल किती?मध्य प्रदेश विधानसभेत एकूण २३० आमदार निवडून जातात. मात्र दोन आमदारांच्या निधनामुळे सध्या विधानसभेतल्या आमदारांची संख्या २२८ आहे. कालपर्यंत विधानसभेत काँग्रेसचे ११५ आमदार होते. मात्र सिंग यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस आमदारांची संख्या ११४ झाली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या १०७ इतकी आहे. समाजवादी पार्टीच्या दोन आमदारांसह चार अपक्ष आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. यातला एक आमदार अद्याप बेपत्ता आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा