शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

“मुंबई हल्ल्यानंतर पाकवर कारवाई न करणे कमकुवतपणाचे लक्षण”; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 10:38 IST

मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तावर आक्रमकपणे कठोर कारवाई करायला हवी होती. पण मनमोहन सरकार निष्क्रिय राहिले, अशी टीका करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता १३ वर्षे होत आहेत. याच पार्श्वभूमीवर एका काँग्रेस नेत्याने पक्षाला घरचा आहेर देत तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई हल्ल्यानंतर मनमोहन सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही. कारवाई न करणे कमकुवतपणाचे लक्षण होते, अशी टीका करण्यात आली आहे. 

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी आपल्या एका पुस्तकात पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारने मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई न केल्याबाबत हल्लाबोल केला आहे. मनिष तिवारी आपल्या पुस्तकात म्हणतात की, एखाद्या देशाला (पाकिस्तान) निर्दोष नागरिकांची क्रूरपणे हत्या करण्याची खंत वाटत नाही, तर संयम ही ताकदीचे नाही, तर कमकुवतपणाचे लक्षण आहे, असे मनिष तिवारी यांनी म्हटले आहे. 

शब्दांपेक्षा कठोर कारवाईने उत्तर द्यायला हवे होते

२६/११ हल्ल्यानंतर एक मोठी संधी होती, जिथे शब्दांपेक्षा कठोर कारवाई करून जशास तसे उत्तर द्यायला हवे होते, असे सांगत मनिष तिवारी यांनी मुंबई हल्ल्याची तुलना ९/११ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याशी केली आहे. अमेरिकेने जशी तीव्र आणि आक्रमक कारवाई केली, तशी भारतानेही करायला हवी होती, या शब्दांत मनिष तिवारी यांनी पक्षाच्या भूमिकेवर टीका केली. यापूर्वीही मनिष तिवारी यांनी पंजाबमधील राजकीय अस्थिरतेवरून काँग्रेस पक्षाला घरचा आहेर ते टीका केली होती. तसेच कन्हैय्या कुमारला काँग्रेस पक्षाने दिलेल्या प्रवेशावरूनही मनिष तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

दरम्यान, मनिष तिवारी यांच्यानंतर भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही यूपीए सरकारवर टीका केली आहे. मनिष तिवारी यांनी २६/११ च्या संदर्भात स्पष्ट केलेली भूमिका योग्य आहे. यूपीए सरकारचा तो कमकुवतपणाच होता. तेव्हाचे एअर चीफ मार्शल फली मेजन यांनीही वायुसेना कारवाई करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. मात्र, यूपीएच्या मनमोहन सिंग सरकारने तसे करू दिले नाही. २६/११ च्या कारवाईनंतर यूपीए सरकार हिंदूंना दोषी ठरवण्यात आणि पाकिस्तानचा बचाव करण्यात व्यस्त होते, अशी घणाघाती टीका पूनावाला यांनी केली आहे.  

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाManmohan Singhमनमोहन सिंगcongressकाँग्रेस