शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

“मुंबई हल्ल्यानंतर पाकवर कारवाई न करणे कमकुवतपणाचे लक्षण”; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 10:38 IST

मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तावर आक्रमकपणे कठोर कारवाई करायला हवी होती. पण मनमोहन सरकार निष्क्रिय राहिले, अशी टीका करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता १३ वर्षे होत आहेत. याच पार्श्वभूमीवर एका काँग्रेस नेत्याने पक्षाला घरचा आहेर देत तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई हल्ल्यानंतर मनमोहन सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही. कारवाई न करणे कमकुवतपणाचे लक्षण होते, अशी टीका करण्यात आली आहे. 

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी आपल्या एका पुस्तकात पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारने मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई न केल्याबाबत हल्लाबोल केला आहे. मनिष तिवारी आपल्या पुस्तकात म्हणतात की, एखाद्या देशाला (पाकिस्तान) निर्दोष नागरिकांची क्रूरपणे हत्या करण्याची खंत वाटत नाही, तर संयम ही ताकदीचे नाही, तर कमकुवतपणाचे लक्षण आहे, असे मनिष तिवारी यांनी म्हटले आहे. 

शब्दांपेक्षा कठोर कारवाईने उत्तर द्यायला हवे होते

२६/११ हल्ल्यानंतर एक मोठी संधी होती, जिथे शब्दांपेक्षा कठोर कारवाई करून जशास तसे उत्तर द्यायला हवे होते, असे सांगत मनिष तिवारी यांनी मुंबई हल्ल्याची तुलना ९/११ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याशी केली आहे. अमेरिकेने जशी तीव्र आणि आक्रमक कारवाई केली, तशी भारतानेही करायला हवी होती, या शब्दांत मनिष तिवारी यांनी पक्षाच्या भूमिकेवर टीका केली. यापूर्वीही मनिष तिवारी यांनी पंजाबमधील राजकीय अस्थिरतेवरून काँग्रेस पक्षाला घरचा आहेर ते टीका केली होती. तसेच कन्हैय्या कुमारला काँग्रेस पक्षाने दिलेल्या प्रवेशावरूनही मनिष तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

दरम्यान, मनिष तिवारी यांच्यानंतर भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही यूपीए सरकारवर टीका केली आहे. मनिष तिवारी यांनी २६/११ च्या संदर्भात स्पष्ट केलेली भूमिका योग्य आहे. यूपीए सरकारचा तो कमकुवतपणाच होता. तेव्हाचे एअर चीफ मार्शल फली मेजन यांनीही वायुसेना कारवाई करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. मात्र, यूपीएच्या मनमोहन सिंग सरकारने तसे करू दिले नाही. २६/११ च्या कारवाईनंतर यूपीए सरकार हिंदूंना दोषी ठरवण्यात आणि पाकिस्तानचा बचाव करण्यात व्यस्त होते, अशी घणाघाती टीका पूनावाला यांनी केली आहे.  

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाManmohan Singhमनमोहन सिंगcongressकाँग्रेस