शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असेल जनभावनांचे प्रतिबिंब- पी. चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:40 IST

मुंबईतील सर्व स्तरातील लोकांनी दोन तासांच्या भेटीत तब्बल ६७ सूचना जाहीरनामा समितीला दिल्या असून, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्याचे निश्चित प्रतिबिंब उमटेल, असे प्रतिपादन काँग्रेस जाहीरनामा समितीचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केले.

मुंबई : काँग्रेस पक्ष हा ‘मन की बात’ नव्हे, तर ‘जन की बात’ करणारा पक्ष आहे. त्यामुळेच लोकांमध्ये जाऊन आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा तयार करीत आहोत. मुंबईतील सर्व स्तरातील लोकांनी दोन तासांच्या भेटीत तब्बल ६७ सूचना जाहीरनामा समितीला दिल्या असून, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्याचे निश्चित प्रतिबिंब उमटेल, असे प्रतिपादन काँग्रेस जाहीरनामा समितीचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केले.मुंबईकरांसाठी महागाई, रोजगार आणि संरक्षण हे महत्त्वाचे मुद्दे असून, तेच मोदी पर्वाचा शेवट करतील, असे भाकीतही त्यांनी वर्तवले. मुंबई काँग्रेसने जाहीरनाम्यासंदर्भात वांद्रे (प.) येथील अ‍ॅम्फी थिएटरमध्ये परिसंवाद आयोजित केला होता. मुंबई काँगेसचे अध्यक्ष संजय निरुपम, खासदार कुमार केतकर, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते. परिसंवादात ज्येष्ठ नागरिक, महिला, उद्योजक, डॉक्टर, वकील, विचारवंत, व्यावसायिक, व्यापारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.चिदंबरम म्हणाले, भाजपा सरकार हे अहंकारी सरकार आहे. लोकशाहीला न मानणाऱ्या पक्षाचे हे सरकार जुमलेबाज सरकार आहे. म्हणूनच ए.सी. केबिनमध्ये बसून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील, दोन कोटी नोकऱ्या देऊ, अशा घोषणा भाजपाने केल्या. काँग्रेस अशी खोटी आश्वासने देणार नाही.जनतेत जाऊन त्यांच्या मागण्या, अडचणी आम्ही समजून घेऊ. त्यावरील उपायांची चर्चा करून त्यांचा आमच्या जाहीरनाम्यात समावेश करू. त्यासाठीच या परिसंवादाचे आयोजन केले आहे. मुंबईकरांचे म्हणणे ऐकण्यासाठीच आम्ही आलो आहोत. तुम्ही कोणत्याही विषयावर बोलू शकता. उपाय व सूचना सुचवू शकता. अडचणी सांगू शकता, असे चिदंबरम म्हणाले.जाहीरमान्यात समस्यांचा विचार करूमुंबईतील पायाभूत सुविधा, पाणी समस्या, बेरोजगारी, महागाई, इंधनाचे वाढते दर, कचरा व्यवस्थापन व स्वच्छता, महिला संरक्षण, महिला प्रवाशांच्या समस्या, खासगीकरण, लघू व मध्यम उद्योगांच्या समस्या, जीएसटी, नोटाबंदीचे परिणाम, कोलमडलेली अर्थव्यवस्था अशा विविध समस्या व अडचणी उपस्थितांनी मांडल्या. या सर्व मागण्या ऐकल्यानंतर महागाई, रोजगार आणि संरक्षण या मुंबईकरांच्या प्रमुख समस्या असल्याचा निष्कर्ष चिदंबरम यांनी काढला. या तिन्ही समस्यांचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये सर्वांगीण विचार केला जाईल, अशी ग्वाही चिदंबरम यांनी या वेळी दिली.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेसBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९