शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असेल जनभावनांचे प्रतिबिंब- पी. चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:40 IST

मुंबईतील सर्व स्तरातील लोकांनी दोन तासांच्या भेटीत तब्बल ६७ सूचना जाहीरनामा समितीला दिल्या असून, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्याचे निश्चित प्रतिबिंब उमटेल, असे प्रतिपादन काँग्रेस जाहीरनामा समितीचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केले.

मुंबई : काँग्रेस पक्ष हा ‘मन की बात’ नव्हे, तर ‘जन की बात’ करणारा पक्ष आहे. त्यामुळेच लोकांमध्ये जाऊन आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा तयार करीत आहोत. मुंबईतील सर्व स्तरातील लोकांनी दोन तासांच्या भेटीत तब्बल ६७ सूचना जाहीरनामा समितीला दिल्या असून, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्याचे निश्चित प्रतिबिंब उमटेल, असे प्रतिपादन काँग्रेस जाहीरनामा समितीचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केले.मुंबईकरांसाठी महागाई, रोजगार आणि संरक्षण हे महत्त्वाचे मुद्दे असून, तेच मोदी पर्वाचा शेवट करतील, असे भाकीतही त्यांनी वर्तवले. मुंबई काँग्रेसने जाहीरनाम्यासंदर्भात वांद्रे (प.) येथील अ‍ॅम्फी थिएटरमध्ये परिसंवाद आयोजित केला होता. मुंबई काँगेसचे अध्यक्ष संजय निरुपम, खासदार कुमार केतकर, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते. परिसंवादात ज्येष्ठ नागरिक, महिला, उद्योजक, डॉक्टर, वकील, विचारवंत, व्यावसायिक, व्यापारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.चिदंबरम म्हणाले, भाजपा सरकार हे अहंकारी सरकार आहे. लोकशाहीला न मानणाऱ्या पक्षाचे हे सरकार जुमलेबाज सरकार आहे. म्हणूनच ए.सी. केबिनमध्ये बसून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील, दोन कोटी नोकऱ्या देऊ, अशा घोषणा भाजपाने केल्या. काँग्रेस अशी खोटी आश्वासने देणार नाही.जनतेत जाऊन त्यांच्या मागण्या, अडचणी आम्ही समजून घेऊ. त्यावरील उपायांची चर्चा करून त्यांचा आमच्या जाहीरनाम्यात समावेश करू. त्यासाठीच या परिसंवादाचे आयोजन केले आहे. मुंबईकरांचे म्हणणे ऐकण्यासाठीच आम्ही आलो आहोत. तुम्ही कोणत्याही विषयावर बोलू शकता. उपाय व सूचना सुचवू शकता. अडचणी सांगू शकता, असे चिदंबरम म्हणाले.जाहीरमान्यात समस्यांचा विचार करूमुंबईतील पायाभूत सुविधा, पाणी समस्या, बेरोजगारी, महागाई, इंधनाचे वाढते दर, कचरा व्यवस्थापन व स्वच्छता, महिला संरक्षण, महिला प्रवाशांच्या समस्या, खासगीकरण, लघू व मध्यम उद्योगांच्या समस्या, जीएसटी, नोटाबंदीचे परिणाम, कोलमडलेली अर्थव्यवस्था अशा विविध समस्या व अडचणी उपस्थितांनी मांडल्या. या सर्व मागण्या ऐकल्यानंतर महागाई, रोजगार आणि संरक्षण या मुंबईकरांच्या प्रमुख समस्या असल्याचा निष्कर्ष चिदंबरम यांनी काढला. या तिन्ही समस्यांचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये सर्वांगीण विचार केला जाईल, अशी ग्वाही चिदंबरम यांनी या वेळी दिली.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेसBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९