शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
3
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
4
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
5
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
6
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
7
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
8
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
9
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
10
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
11
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
12
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
13
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
14
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
15
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
16
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
17
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
18
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
19
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
20
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 12:29 IST

Lok Sabha Election 2024 Mallikarjun Kharge And Narendra Modi : मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी लखनौमध्ये सांगितलं की, लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांनंतर इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी लखनौमध्ये सांगितलं की, लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांनंतर इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करत आहे. उत्तर प्रदेशच्या राजधानीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत असताना काँग्रेस अध्यक्षांनी असं म्हटलं आहे. 

इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याचा दावा करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे. जनतेने पंतप्रधान मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशातील वातावरण पाहता आम्ही असं म्हणू शकतो की, इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करत आहे."

"2024 ची निवडणूक ही सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. ही विचारधारेची निवडणूक आहे. एकीकडे गरिबांच्या बाजूने लढणारे पक्ष एकजुटीने लढत आहेत. दुसरीकडे श्रीमंतांसोबत राहून जे अंधश्रद्धेसाठी लढत आहेत ते एकत्र लढत आहेत. हे लोक धर्माच्या आधारावर लढत आहेत."

"आमचा लढा गरिबांच्या बाजूने आहे. ज्यांना एक वेळचे जेवण मिळत नाही, ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. पदवी आणि डिप्लोमा करूनही त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. सरकारमध्ये अनेक जागा रिक्त आहेत, पण त्या जागा भरायला केंद्र तयार नाही."

"इंडिया आघाडी बेरोजगारी आणि महागाईविरोधात लढत आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे, अन्यथा आपण गुलामगिरीत जाऊ. प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. जर लोकशाही नसेल आणि हुकूमशाही असेल, तर तुम्ही कस मतदान कराल?" असं देखील मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडी