शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

मध्य प्रदेशात काँग्रेसचे बहुमताचे गणित जमले; पण, रिकामी तिजोरी घेऊन करावे लागेल काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 06:32 IST

बसपा, सपा व अपक्षांवर मदार; साऱ्यांना खुश ठेवणे गरजेचे

भोपाळ : मंगळवारी रात्रीपर्यंत मध्य प्रदेशातकाँग्रेसभाजपा यांपैकी कोण सत्तेत येणार, याविषयी गोंधळ होता. मतमोजणी सुरू असताना कधी काँग्रेस पुढे तर कधी भाजपा, असेच चित्र होते. बुधवार पहाटे चित्र स्पष्ट झाले. काँग्रेसला ११४ तर भाजपाला १0९ जागा मिळाल्या. पण स्पष्ट बहुमत कोणालाच नाही. सर्वाधिक जागा मिळवलेला पक्ष म्हणून काँग्रेसलाच बोलावण्याची वेळ राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यावर आली. अर्थात तोपर्यंत बसपा व सपा यांचा पाठिंबा आणि चार अपक्ष आमदारांचे समर्थन या पद्धतीने काँग्रेसने आकडा १२१ पर्यंत नेला.पुढील पाच वर्षे या सर्व बाहेरच्या आमदारांना खुश ठेवणे हेच मोठे काम काँग्रेसला करावे लागेल. अपक्ष, बसपा, सपा यांच्या आमदारांच्या अनेक मागण्या निष्कारण पूर्ण कराव्या लागतील. पण त्याला नाईलाज आहे. जनतेने कोणालाच स्पष्ट कौल न दिल्याचा हा परिणाम. मुख्यमंत्री शिवराज सिंह मंगळवारी रात्रीपर्यंत राज्यपालांकडे राजीनामा द्यायला गेले नाहीत, याचे कारण हेच होते. कुठे तरी आपल्या एक-दोन जागा वाढतील आणि काँग्रेसच्या कमी होतील, असे त्यांना वाटत होते. पण तोपर्यंत न थांबता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी रात्री साडेदहा वाजताच राज्यपालांना पत्र पाठवून सरकार स्थापनेचा दावा केला. त्यांनी आधी पत्र फॅक्सने पाठवले. पण न जाणो, काश्मीरच्या राजभवनातील फॅक्स बंद असल्याने विरोधकांचा सरकार स्थापनेचा प्रयत्न चुकला, तसे होऊ नये, म्हणून काँग्रेसने राजभवनात रात्री प्रत्यक्ष पत्र पाठवून अधिकाºयांकडून ते मिळाल्याची सहीही घेतली.काँग्रेसने मध्य प्रदेशातील शिवराज सिंह सरकारवर टीका करताना, शेतकºयांना कर्जमाफी तसेच असंख्य लोकप्रियता मिळवून देणारी आश्वासने दिली आहेत. राज्याच्या तिजोरीत अर्थातच ठणठणात आहे. अनेकदा सरकारी कर्मचाºयांचा पगार द्यायला निधी नसतो. अनेक विकासाच्या योजनांचा पैसा अन्यत्र वळवण्याचे वा त्यांना कात्री लावण्याचे काम चौहान सरकारने केले. अशा स्थितीत आश्वासने पूर्ण करणे काँग्रेसला सोपे नाही. ते करताना राज्याला आर्थिक शिस्त लावणेही गरजेचे आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून सतत अडवणूक होणार, हेही गृहित धरूनच योजना आखाव्या लागतील. सतत केंद्राने मदत केली नाही, अशी ओरड करून चालणार नाही. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. तोपर्यंत काही आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले पडणे गरजेचे आहे. कर्जमाफीची घोषणा सरकार कदाचित लगेचच करेल. पण रोजगार लगेच तयार होत नाहीत. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तरच लोकसभेच्या २९ जागा जिंकण्यासाठी पावले पडली असे म्हणता येईल. काँग्रेस व भाजपा यांना मिळालेल्या मतांत फार फरक नाही. काँग्रेसला ४९.६ व भाजपाला ४७.४ टक्के मिळाली आहेत. हा फरक तो वाढला तरच फायदा होईल.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा