शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

गोवा, कर्नाटकनंतर राजकीय वादळ मध्य प्रदेशात जाणार? काँग्रेस नेते चिंतेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 10:37 IST

भाजपा गेल्या 7 महिन्यांपासून स्वप्न बघत आहे. जे अद्याप साकार झालं नाही असा टोला मंत्री प्रदीप जयस्वाल यांनी भाजपाला लगावला आहे. 

भोपाळ - कर्नाटक आणि गोव्यानंतर भाजपाच्या निशाण्यावर मध्य प्रदेश सरकार आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. भाजपा नेत्यांकडून तसे संकेत मिळत असले तरी काँग्रेसकडून विरोधी पक्ष स्वप्न बघत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र खबरदारी म्हणून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एका मंत्र्याला 4 आमदारांना सांभळण्याची जबाबदारी दिली आहे. सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपाचे माजी मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गोवा आणि कर्नाटकमधून उठलेलं वादळ मध्य प्रदेशच्या दिशेने वाहत असून काही दिवसांत वातावरण ठिक होईल असा व्हॉट्सअप मॅसेज आल्याचं सांगत संकेत दिले आहेत. 

तर मध्य प्रदेशमधील अन्न पुरवठा मंत्री प्रद्युम सिंह तोमर यांनी सरकारवर कोणतंही संकट नसल्याचा दावा केला आहे. सरकारला कोणताही धोका नाही, हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असं आरोग्य मंत्री तुलसी सिलावट यांनी सांगितले आहे. तर भाजपा गेल्या 7 महिन्यांपासून स्वप्न बघत आहे. जे अद्याप साकार झालं नाही असा टोला मंत्री प्रदीप जयस्वाल यांनी भाजपाला लगावला आहे. 2018 मध्ये झालेल्या मध्य प्रदेश निवडणुकीत भाजपाला 109 जागा तर काँग्रेसला 114 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपातील एका आमदाराला खासदारकीची संधी मिळाल्यामुळे भाजपाची संख्या 108 झाली आहे. सरकार स्थापनेसाठी 116 आमदारांची गरज आहे.

काँग्रेस सरकारला 1 समाजवादी पक्ष, 2 बसपा आणि 4 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांकडून सत्ता स्थापनेची स्वप्न पाहिली जात आहे असा दावा काँग्रेसने केला. तर ज्या बसपा आमदाराने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे तो आमदार सध्या नाराज आहे. शुक्रवारी विधानसभेत बसपा आमदार रामबाई यांनी त्यांच्या कुटुंबाला एक प्रकरणात गोवलं जात आहे असा आरोप केला. तसेच जर त्यांना न्याय मिळत नसेल तर राज्यात कोणाला न्याय मिळणार अशी नाराजी बसपा आमदाराने बोलून दाखविली त्यामुळे भाजपा नेते आनंदी आहेत. त्यामुळे आगामी काळात गोवा, कर्नाटकसारखं मध्य प्रदेशातही राजकीय संकट उभं राहील का यावर प्रश्नचिन्ह आहे.   

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस