शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

काँग्रेसने ईशान्येला आंदोलनाची भूमी बनवली; अमित शाहांनी काँग्रेसवर साधला निशाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 15:58 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आसाम दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी येथील भाजपच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले.

गुवाहाटी: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आसाम दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी येथील भाजपच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी क्राँग्रेसवर निशाना साधला. "इशान्येतील भूमिला काँग्रेसने आंदोलनाची भूमी बनवले आहे. विकास नव्हता तर फक्त दंगे होते, ना शिक्षण होते, ना शांती, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर केली. 

२०१४ नंतर इशान्येच्या भूमित विकास होत आहे याची मला खुशी आहे. आमचे सरकार आल्यानंतर इशान्येच्या राज्यात विकास कामे सुरू झाली आहेत.आता भाजप पक्षाचेही इशान्येच्या भूमित विकास सुरू आहे. भाजपचे हे कार्यालय कार्यकर्त्यांसाठी मंदीर आहे, असंही अमित शाह म्हणाले. 

आरएसएस'ने इंग्रजांना मदत केली, सावरकरांना स्टायपेंड मिळत होते; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेस हा विचारी पक्ष नाही. आमचा पक्ष विचारी पक्ष आहे, आमचा पक्ष सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. आपल्याला आपला पक्ष मजबूत करायचा आहे. आज ७० हजार लोक आमच्या विचारधारेत सामील होत आहेत, असंही अमित शाह म्हणाले. 

यावेळी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही काँग्रेसवर टीका केली.'एक काळ असा होता की आसाम चार देशांनी वेढलेला होता, संकटात होता. देशाचे नेतृत्व कमकुवत होते. पण, आज हा ईशान्य, हा आसाम मुख्य प्रवाहात सामील झाला आहे आणि विकासाच्या प्रक्रियेत प्रामुख्याने पुढे येत आहे. एकेकाळी हे राज्य आंदालनासाठी ओळखले जायचे. आज ते एक शांत आणि विकसनशील राज्य आहे, असंही जे पी नड्डा म्हणाले.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेसJ P Naddaजगत प्रकाश नड्डा