शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

Union Budget 2022: “मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ शून्य आणि शून्यच”; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 18:31 IST

Union Budget 2022: यंदाचे केंद्रीय बजेट श्रीमंतांसाठीचे असून, गरिबांसाठी यात काहीच नाही, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) संसदेत सादर केला. अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे शून्य असल्याची टीका केली आहे. 

राहुल गांधी अर्थसंकल्पावर टीका करणारे ट्विट केले आहे. अर्थसंकल्पात पगारदार कर्मचारी, मध्यम वर्ग, गरीब, शेतकरी, तरुण आणि छोट्या व्यावसायिकांसाठी काहीच नाही. मोदी सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प केवळ शून्य आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

अर्थसंकल्पातून कुठलाही दिलासा मिळालेला नाही

देशातील कर्मचारी वर्ग, मध्यम वर्ग हा महागाई आणि कपातीमुळे चिंतेत आहे. पण अर्थसंकल्पातून त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. अर्थमंत्री आणि पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा प्रत्यक्ष करासंबंधित पावलांनी या वर्गांना निराश केले आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलीय. सरकारने क्रिप्टोकरन्सीवरील रक्कमेवर ३० टक्के कर लावून क्रिप्टोकरन्सीला कायदा न करताच वैध ठरवले आहे का? असा सवालही सुरजेवाला यांनी केला आहे.

गरिबांसाठी यात काहीच नाही

यंदाचे केंद्रीय बजेट श्रीमंतांसाठीचे आहे. गरिबांसाठी यात काहीच नाही. क्रिप्टोकरन्सीवर सरकारने ३० टक्के कर जाहीर केला. पण क्रिप्टोकरन्सीचा कायदाच अस्तित्वात नाही. आणि त्याच्यावर कधी चर्चाही झाली नाही. हा अर्थसंकल्प सरकारच्या मित्रांना फायदा पोहोचवणारा आहे, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.

दिशाहिन असलेला हा अर्थसंकल्प

दिशाहिन असलेला हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी यात काहीच नाही. या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत काहीच म्हटलेले नाही. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाचाही उल्लेख नाही, असे म्हणत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी टीका केली आहे. तसेच महागाईमुळे त्रस्त असलेल्या गरीब, सामान्य आणि करदात्यांना अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. तसंच समाजातील गरीब-श्रीमंतामधील वाढत असलेली दरी दूर करण्याचा प्रयत्न होईल, असं वाटत होतं. पण या अर्थसंकल्पातून कुणालाही दिलासा मिळालेला नाही. छोट्या उद्योगांनाही काही दिलेलं नाही, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली आहे. 

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019nirmala sitharamanनिर्मला सीतारामनRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस