शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Union Budget 2022: “मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ शून्य आणि शून्यच”; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 18:31 IST

Union Budget 2022: यंदाचे केंद्रीय बजेट श्रीमंतांसाठीचे असून, गरिबांसाठी यात काहीच नाही, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) संसदेत सादर केला. अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे शून्य असल्याची टीका केली आहे. 

राहुल गांधी अर्थसंकल्पावर टीका करणारे ट्विट केले आहे. अर्थसंकल्पात पगारदार कर्मचारी, मध्यम वर्ग, गरीब, शेतकरी, तरुण आणि छोट्या व्यावसायिकांसाठी काहीच नाही. मोदी सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प केवळ शून्य आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

अर्थसंकल्पातून कुठलाही दिलासा मिळालेला नाही

देशातील कर्मचारी वर्ग, मध्यम वर्ग हा महागाई आणि कपातीमुळे चिंतेत आहे. पण अर्थसंकल्पातून त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. अर्थमंत्री आणि पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा प्रत्यक्ष करासंबंधित पावलांनी या वर्गांना निराश केले आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलीय. सरकारने क्रिप्टोकरन्सीवरील रक्कमेवर ३० टक्के कर लावून क्रिप्टोकरन्सीला कायदा न करताच वैध ठरवले आहे का? असा सवालही सुरजेवाला यांनी केला आहे.

गरिबांसाठी यात काहीच नाही

यंदाचे केंद्रीय बजेट श्रीमंतांसाठीचे आहे. गरिबांसाठी यात काहीच नाही. क्रिप्टोकरन्सीवर सरकारने ३० टक्के कर जाहीर केला. पण क्रिप्टोकरन्सीचा कायदाच अस्तित्वात नाही. आणि त्याच्यावर कधी चर्चाही झाली नाही. हा अर्थसंकल्प सरकारच्या मित्रांना फायदा पोहोचवणारा आहे, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.

दिशाहिन असलेला हा अर्थसंकल्प

दिशाहिन असलेला हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी यात काहीच नाही. या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत काहीच म्हटलेले नाही. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाचाही उल्लेख नाही, असे म्हणत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी टीका केली आहे. तसेच महागाईमुळे त्रस्त असलेल्या गरीब, सामान्य आणि करदात्यांना अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. तसंच समाजातील गरीब-श्रीमंतामधील वाढत असलेली दरी दूर करण्याचा प्रयत्न होईल, असं वाटत होतं. पण या अर्थसंकल्पातून कुणालाही दिलासा मिळालेला नाही. छोट्या उद्योगांनाही काही दिलेलं नाही, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली आहे. 

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019nirmala sitharamanनिर्मला सीतारामनRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस