शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Union Budget 2022: “मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ शून्य आणि शून्यच”; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 18:31 IST

Union Budget 2022: यंदाचे केंद्रीय बजेट श्रीमंतांसाठीचे असून, गरिबांसाठी यात काहीच नाही, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) संसदेत सादर केला. अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे शून्य असल्याची टीका केली आहे. 

राहुल गांधी अर्थसंकल्पावर टीका करणारे ट्विट केले आहे. अर्थसंकल्पात पगारदार कर्मचारी, मध्यम वर्ग, गरीब, शेतकरी, तरुण आणि छोट्या व्यावसायिकांसाठी काहीच नाही. मोदी सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प केवळ शून्य आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

अर्थसंकल्पातून कुठलाही दिलासा मिळालेला नाही

देशातील कर्मचारी वर्ग, मध्यम वर्ग हा महागाई आणि कपातीमुळे चिंतेत आहे. पण अर्थसंकल्पातून त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. अर्थमंत्री आणि पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा प्रत्यक्ष करासंबंधित पावलांनी या वर्गांना निराश केले आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलीय. सरकारने क्रिप्टोकरन्सीवरील रक्कमेवर ३० टक्के कर लावून क्रिप्टोकरन्सीला कायदा न करताच वैध ठरवले आहे का? असा सवालही सुरजेवाला यांनी केला आहे.

गरिबांसाठी यात काहीच नाही

यंदाचे केंद्रीय बजेट श्रीमंतांसाठीचे आहे. गरिबांसाठी यात काहीच नाही. क्रिप्टोकरन्सीवर सरकारने ३० टक्के कर जाहीर केला. पण क्रिप्टोकरन्सीचा कायदाच अस्तित्वात नाही. आणि त्याच्यावर कधी चर्चाही झाली नाही. हा अर्थसंकल्प सरकारच्या मित्रांना फायदा पोहोचवणारा आहे, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.

दिशाहिन असलेला हा अर्थसंकल्प

दिशाहिन असलेला हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी यात काहीच नाही. या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत काहीच म्हटलेले नाही. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाचाही उल्लेख नाही, असे म्हणत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी टीका केली आहे. तसेच महागाईमुळे त्रस्त असलेल्या गरीब, सामान्य आणि करदात्यांना अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. तसंच समाजातील गरीब-श्रीमंतामधील वाढत असलेली दरी दूर करण्याचा प्रयत्न होईल, असं वाटत होतं. पण या अर्थसंकल्पातून कुणालाही दिलासा मिळालेला नाही. छोट्या उद्योगांनाही काही दिलेलं नाही, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली आहे. 

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019nirmala sitharamanनिर्मला सीतारामनRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस