शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

झारखंडमध्येही काँग्रेसच्या नेतृत्वाची पाठ; महाराष्ट्रासारखा 'करिष्मा' होण्याची पाहतायत वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 16:14 IST

झारखंडमध्ये 30 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

रांची : झारखंडमध्ये निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. मात्र, काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आलेली आहे. लोकसभेला दारूण पराभवानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा घेतलेले राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आतापर्यंत राहुल गांधी फारसे सक्रीय दिसले नाहीत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच सभा घेतल्या होत्या. आता झारखंडमध्येही तोच कित्ता गिरविला जात आहे. यामुळे स्थानिक नेते दुबळे ठरणार आहेत. 

झारखंडमध्ये 30 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. निवडणुकीला प्रचारासाठी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या येण्याबाबत काही निश्चिती नाही. तर पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांना प्रचारासाठी बोलवणे नाही. स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राहुल गांधी यांचे नाव आहे. तसेच त्यांना राज्यातील प्रमुख मुद्द्यांची यादी दिली आहे. मात्र पहिला टप्पा उलटायला 9 दिवस बाकी असताना राहुल यांच्या सहभागाबाबत संदिग्धता आहे. 

सध्याच्या घडीला मध्य प्रदेशचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया काही भागात प्रचार करणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात राजकीय सत्तासमीकरणे बदलल्याने कार्यरत झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी झारखंडकडेही पाठ फिरवल्याचे चित्र आहे. झारखंडचे प्रदेश अध्यक्षच निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांना त्यांच्या मतदारसंघात लक्ष द्यावे लागत आहे. यामुळे त्यांना राज्यात फिरता येत नाही. 

29 नोव्हेंबरला राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसचे नेते आणण्याचा प्रयत्न असल्याचे राज्यातील नेत्यांनी सांगितले. यामध्ये मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019