शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

झारखंडमध्येही काँग्रेसच्या नेतृत्वाची पाठ; महाराष्ट्रासारखा 'करिष्मा' होण्याची पाहतायत वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 16:14 IST

झारखंडमध्ये 30 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

रांची : झारखंडमध्ये निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. मात्र, काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आलेली आहे. लोकसभेला दारूण पराभवानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा घेतलेले राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आतापर्यंत राहुल गांधी फारसे सक्रीय दिसले नाहीत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच सभा घेतल्या होत्या. आता झारखंडमध्येही तोच कित्ता गिरविला जात आहे. यामुळे स्थानिक नेते दुबळे ठरणार आहेत. 

झारखंडमध्ये 30 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. निवडणुकीला प्रचारासाठी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या येण्याबाबत काही निश्चिती नाही. तर पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांना प्रचारासाठी बोलवणे नाही. स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राहुल गांधी यांचे नाव आहे. तसेच त्यांना राज्यातील प्रमुख मुद्द्यांची यादी दिली आहे. मात्र पहिला टप्पा उलटायला 9 दिवस बाकी असताना राहुल यांच्या सहभागाबाबत संदिग्धता आहे. 

सध्याच्या घडीला मध्य प्रदेशचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया काही भागात प्रचार करणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात राजकीय सत्तासमीकरणे बदलल्याने कार्यरत झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी झारखंडकडेही पाठ फिरवल्याचे चित्र आहे. झारखंडचे प्रदेश अध्यक्षच निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांना त्यांच्या मतदारसंघात लक्ष द्यावे लागत आहे. यामुळे त्यांना राज्यात फिरता येत नाही. 

29 नोव्हेंबरला राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसचे नेते आणण्याचा प्रयत्न असल्याचे राज्यातील नेत्यांनी सांगितले. यामध्ये मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019