शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांनी अध्यक्ष राहावे यासाठी काँग्रेस नेत्यांनी तयार केला फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 06:35 IST

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहावे, तोपर्यंत नव्या अध्यक्षाचा शोध घेण्यात येईल, असा फॉर्म्युला काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी तयार केला.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : महाराष्ट्र, हरयाणासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत तरी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहावे, तोपर्यंत नव्या अध्यक्षाचा शोध घेण्यात येईल, असा फॉर्म्युला काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी तयार केला. त्यामुळे किमान चार महिने तरी राहुल गांधी पक्षाध्यक्षपदी राहतील, असे नेत्यांना वाटत आहे.या तीन ते चार महिन्यांच्या काळात राहुल गांधी यांनी त्यांना स्वत:ला हवे आहेत, ते बदल पक्ष संघटनेत करावेत, त्यास कोणीही आक्षेप घ्यायचा नाही वा विरोध करायचा नाही, असेही काँग्रेस नेत्यांनी ठरविले आहे. म्हणजे राहुल गांधी यांना नाममात्र नव्हे, तर खऱ्या अर्थाने सर्वाधिकार देण्यास काँग्रेसचे नेते तयार झाले आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याही या फॉर्म्युल्याशी सहमत आहेत. मात्र राहुल गांधी यांनी तो स्वीकारला वा नाही, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आज दिवसभरात राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यांच्या राज्यात झालेल्या पराभवाबाबत चर्चा केली. त्यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट, प्रमोद तिवारी, शीला दीक्षित आदींचा समावेश होता. काल दिवसभर नेत्यांना भेटण्यास टाळणाºया राहुल गांधी यांनी आज भेट दिल्याने ते आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करतील, असे नेत्यांना वाटत आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील नेते गुलाम नबी आझाद यांना बंगळुरूला जाऊ न काँग्रेस आमदारांना भेटण्याच्या सूचनाही राहुल यांनी आज दिल्या. त्यानुसार ते रवानाही झाले. कर्नाटकातील काँग्रेस आमदारांमध्ये दिसणारी सुंदोपसुंदी, त्याचा फायदा घेत आमदारांना फोडण्याचा भाजपने चालविलेला प्रयत्न आणि त्यामुळे तेथील आघाडीचे सरकार पडण्याची चर्चा या पार्श्वभूमीवर तेथील वातावरण शांत करण्याची जबाबदारी आझाद यांच्यावर सोपवण्यात आली आहे.राहुल गांधी यांना सर्वाधिकार दिल्यानंतर ते त्यांना आवश्यक वाटणाºया नेत्यांना काँग्रेस कार्यकारिणीवर घेऊ शकतील आणि प्रसंगी जुन्या, ज्येष्ठ व वृद्ध नेत्यांना दूरही करू शकतील, असे एका नेत्याने सांगितले. त्यामुळे राहुल यांनी त्यांच्या मनाप्रमाणे काम करता येईल, जुन्या नेत्यांचा दबाव येणार नाही, चेहºयाला तरुण चेहरा मिळू शकेल, असे हा नेता म्हणाला.त्यासाठी ते वाटल्यास राजस्थान व मध्य प्रदेशातील नेतृत्वातही बदल करू शकतील, असे बोलले जाते. मात्र जुन्यांना न दुखावता हे करणे हे त्यांच्यापुढील मोठे आव्हानच असेल. त्यातच राजस्थानच्या काही मंत्री व आमदारांनी अशोक गेहलोत यांच्याविषयी तक्रारी केल्याने त्यांना कदाचित दूर केले जाईल आणि सचिन पायलट यांच्याकडे सत्तासूत्रे सोपवण्यात येतील, अशीही चर्चा आहे.काँग्रेसने एक स्वतंत्र समिनी नियुक्त करून विविध राज्यांत झालेल्या पराभवाचा अभ्यास करेल आणि तो राहुल गांधी वा कार्यकारिणीला सादर करेल,असाही फॉर्म्युल्याचा एक भागआहे.ज्या राज्यात काँग्रेस सत्तेत असूनही पराभव झाला, तिथे कोणत्या नेत्याने, मंत्र्याने दगाफटका केला, कोणी उमेदवारांसाठी काम करण्याचे टाळले, कोणी विरोधकांना मदत केली, यासंबंधीचा सविस्तर अहवाल या समितीने करावा, असा मानस आहे. राहुल गांधी वायनाडच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी केरळला जाणार आहेत. ते आल्यानंतर समितीत कोण असावे, याचा निर्णय होईल, असे समजते.>मित्रपक्षांचाही आग्रहराहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी लालुप्रसाद यादव, द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांच्यासह अनेक मित्रपक्षांच्या नेत्यांनीही केली आहे.राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचे कारण नाही, त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे, असे अभिनेते रजनीकांत यांनी म्हटले आहे, तर राहुल गांधी यांनी निवडणूक काळात घेतलेल्या परिश्रमांचे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कौतुक केले आहे.काँग्रेसचे नेते शशी थरूर, वीरप्पा मोईली, शीला दीक्षित यांनीही राहुल यांनी पक्षाध्यक्षपद अजिबात सोडू नये, असे म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९