शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

राहुल गांधी यांनी अध्यक्ष राहावे यासाठी काँग्रेस नेत्यांनी तयार केला फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 06:35 IST

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहावे, तोपर्यंत नव्या अध्यक्षाचा शोध घेण्यात येईल, असा फॉर्म्युला काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी तयार केला.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : महाराष्ट्र, हरयाणासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत तरी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहावे, तोपर्यंत नव्या अध्यक्षाचा शोध घेण्यात येईल, असा फॉर्म्युला काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी तयार केला. त्यामुळे किमान चार महिने तरी राहुल गांधी पक्षाध्यक्षपदी राहतील, असे नेत्यांना वाटत आहे.या तीन ते चार महिन्यांच्या काळात राहुल गांधी यांनी त्यांना स्वत:ला हवे आहेत, ते बदल पक्ष संघटनेत करावेत, त्यास कोणीही आक्षेप घ्यायचा नाही वा विरोध करायचा नाही, असेही काँग्रेस नेत्यांनी ठरविले आहे. म्हणजे राहुल गांधी यांना नाममात्र नव्हे, तर खऱ्या अर्थाने सर्वाधिकार देण्यास काँग्रेसचे नेते तयार झाले आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याही या फॉर्म्युल्याशी सहमत आहेत. मात्र राहुल गांधी यांनी तो स्वीकारला वा नाही, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आज दिवसभरात राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यांच्या राज्यात झालेल्या पराभवाबाबत चर्चा केली. त्यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट, प्रमोद तिवारी, शीला दीक्षित आदींचा समावेश होता. काल दिवसभर नेत्यांना भेटण्यास टाळणाºया राहुल गांधी यांनी आज भेट दिल्याने ते आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करतील, असे नेत्यांना वाटत आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील नेते गुलाम नबी आझाद यांना बंगळुरूला जाऊ न काँग्रेस आमदारांना भेटण्याच्या सूचनाही राहुल यांनी आज दिल्या. त्यानुसार ते रवानाही झाले. कर्नाटकातील काँग्रेस आमदारांमध्ये दिसणारी सुंदोपसुंदी, त्याचा फायदा घेत आमदारांना फोडण्याचा भाजपने चालविलेला प्रयत्न आणि त्यामुळे तेथील आघाडीचे सरकार पडण्याची चर्चा या पार्श्वभूमीवर तेथील वातावरण शांत करण्याची जबाबदारी आझाद यांच्यावर सोपवण्यात आली आहे.राहुल गांधी यांना सर्वाधिकार दिल्यानंतर ते त्यांना आवश्यक वाटणाºया नेत्यांना काँग्रेस कार्यकारिणीवर घेऊ शकतील आणि प्रसंगी जुन्या, ज्येष्ठ व वृद्ध नेत्यांना दूरही करू शकतील, असे एका नेत्याने सांगितले. त्यामुळे राहुल यांनी त्यांच्या मनाप्रमाणे काम करता येईल, जुन्या नेत्यांचा दबाव येणार नाही, चेहºयाला तरुण चेहरा मिळू शकेल, असे हा नेता म्हणाला.त्यासाठी ते वाटल्यास राजस्थान व मध्य प्रदेशातील नेतृत्वातही बदल करू शकतील, असे बोलले जाते. मात्र जुन्यांना न दुखावता हे करणे हे त्यांच्यापुढील मोठे आव्हानच असेल. त्यातच राजस्थानच्या काही मंत्री व आमदारांनी अशोक गेहलोत यांच्याविषयी तक्रारी केल्याने त्यांना कदाचित दूर केले जाईल आणि सचिन पायलट यांच्याकडे सत्तासूत्रे सोपवण्यात येतील, अशीही चर्चा आहे.काँग्रेसने एक स्वतंत्र समिनी नियुक्त करून विविध राज्यांत झालेल्या पराभवाचा अभ्यास करेल आणि तो राहुल गांधी वा कार्यकारिणीला सादर करेल,असाही फॉर्म्युल्याचा एक भागआहे.ज्या राज्यात काँग्रेस सत्तेत असूनही पराभव झाला, तिथे कोणत्या नेत्याने, मंत्र्याने दगाफटका केला, कोणी उमेदवारांसाठी काम करण्याचे टाळले, कोणी विरोधकांना मदत केली, यासंबंधीचा सविस्तर अहवाल या समितीने करावा, असा मानस आहे. राहुल गांधी वायनाडच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी केरळला जाणार आहेत. ते आल्यानंतर समितीत कोण असावे, याचा निर्णय होईल, असे समजते.>मित्रपक्षांचाही आग्रहराहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी लालुप्रसाद यादव, द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांच्यासह अनेक मित्रपक्षांच्या नेत्यांनीही केली आहे.राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचे कारण नाही, त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे, असे अभिनेते रजनीकांत यांनी म्हटले आहे, तर राहुल गांधी यांनी निवडणूक काळात घेतलेल्या परिश्रमांचे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कौतुक केले आहे.काँग्रेसचे नेते शशी थरूर, वीरप्पा मोईली, शीला दीक्षित यांनीही राहुल यांनी पक्षाध्यक्षपद अजिबात सोडू नये, असे म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९