शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

राज्यातील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची सोनिया गांधींसोबत चर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 21:20 IST

मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळातील पदांच्या समसमान वाटणीवरून भाजपा आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याने राज्यात सरकार नवे स्थापन होऊ शकलेले  नाही.

नवी दिल्ली -  मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळातील पदांच्या समसमान वाटणीवरून भाजपा आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याने राज्यात सरकार नवे स्थापन होऊ शकलेले  नाही. दरम्यान, महायुतीतील मतभेदांमुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना राज्यातील सध्याची परिस्थिती तसेच विधानसभा निकालांसंदर्भात माहिती दिली. सोनिया गांधी यांचे निवासस्थान असलेल्या 10 जनपथ येथे झालेल्या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की,''आज झालेल्या बैठकीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील निकाला संदर्भात माहिती सोनिया गांधी यांना दिली. निवडून आलेल्या जागा, मतविभाणी आणि गमावलेल्या जागांसंदर्भात चर्चा झाली. तसेच सध्या राज्यात निर्माण झालेली परिस्थितीची कल्पनाही सोनिया गांधी यांना दिली.''  मात्र या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली का याबाबत सांगणे मात्र थोरात यांनी टाळले. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर भजापा आणि शिवसेनेने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. त्यातच राज्यात भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत. तसेच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधीसुद्धा फारशा अनुकूल नाहीत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी