शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

राज्यातील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची सोनिया गांधींसोबत चर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 21:20 IST

मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळातील पदांच्या समसमान वाटणीवरून भाजपा आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याने राज्यात सरकार नवे स्थापन होऊ शकलेले  नाही.

नवी दिल्ली -  मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळातील पदांच्या समसमान वाटणीवरून भाजपा आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याने राज्यात सरकार नवे स्थापन होऊ शकलेले  नाही. दरम्यान, महायुतीतील मतभेदांमुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना राज्यातील सध्याची परिस्थिती तसेच विधानसभा निकालांसंदर्भात माहिती दिली. सोनिया गांधी यांचे निवासस्थान असलेल्या 10 जनपथ येथे झालेल्या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की,''आज झालेल्या बैठकीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील निकाला संदर्भात माहिती सोनिया गांधी यांना दिली. निवडून आलेल्या जागा, मतविभाणी आणि गमावलेल्या जागांसंदर्भात चर्चा झाली. तसेच सध्या राज्यात निर्माण झालेली परिस्थितीची कल्पनाही सोनिया गांधी यांना दिली.''  मात्र या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली का याबाबत सांगणे मात्र थोरात यांनी टाळले. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर भजापा आणि शिवसेनेने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. त्यातच राज्यात भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत. तसेच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधीसुद्धा फारशा अनुकूल नाहीत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी