शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

देशाची दिशाभूल केली जात आहे; सोनिया गांधींचा नरेंद्र मोदी, अमित शहांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 22:34 IST

सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा (एनआरसी) या मुद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर निशाणा साधला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात करण्यात आलेले आंदोलन, विद्यापीठ परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर उद्धभवलेली परिस्थिती तसेच विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्र सरकार संविधानाला कमकुवत करत आहे. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशभरात खोटी माहिती देत लोकांमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग करण्यात येत असून या विरोधात लोकांच्या मनात प्रचंड राग आहे. त्याचप्रमाणे सीएए आणि एनआरसी आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांची वागणूक पक्षापाती व क्रूर होती असाही आरोप सोनिया गांधींनी केला आहे. 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या या बैठकीला 20 पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, ए. के. अँटनी, के. सी. वेणुगोपाल, गुलाम नबी आझाद, रणदीप सुरजेवाला, सीताराम येचुरी, डी. राजा, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राजदचे मनोज झा, अजित सिंह देखील उपस्थित होते. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाjnu attackजेएनयूSharad Pawarशरद पवार