शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

"अशाने भारताची प्रतिमा सुधारणार नाही"; सचिन, विराटला शशी थरूर यांचे प्रत्युत्तर

By देवेश फडके | Updated: February 4, 2021 11:29 IST

खेळाडू आणि कलाकारांनी ट्विट करून सरकारला केलेल समर्थन काँग्रेस नेते शशी थरूर यांना रुचलेले दिसत नाही. कारण या सर्वांना शशी थरूर यांनी प्रत्युत्तर देत यामुळे भारताची प्रतिमा सुधारणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देशशी थरूर यांचे सचिन तेंडुलकर, विराट कोहलीला प्रत्युत्तरशेतकरी आंदोलनावरून खेळाडू, कलाकार आणि राजकारणी यांच्यात ट्विटरवॉरअशाने भारताची प्रतिमा सुधारणा नाही - शशी थरूर यांची टीका

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरीआंदोलनाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफानेही शेतकरीआंदोलनाला पाठिंबा देताना भारत सरकारवर टीका केली. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यापासून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. क्रिकेटपटू, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकारणी यांच्यात आता ट्विटर वॉर सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

शेतकरी आंदोलनासंदर्भात भारतरत्न सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, विराट कोहलीपासून ते शिखर धवन, सायना नेहवाल, अक्षय कुमार, तापसी पन्नूपर्यंत अनेकांनी ट्विट करून केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे. मात्र, खेळाडू आणि कलाकारांनी ट्विट करून सरकारला केलेल समर्थन काँग्रेस नेते शशी थरूर यांना रुचलेले दिसत नाही. कारण या सर्वांना शशी थरूर यांनी प्रत्युत्तर देत यामुळे भारताची प्रतिमा सुधारणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

नेमके काय म्हणाले शशी थरूर?

शशी थरूर यांनी एक ट्विट केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींच्या विधानांवर भारतीयांनी प्रतिक्रिया देणे लाजिरवाणे आहे. भारताच्या वैश्विक प्रतिमेचे सरकारच्या हट्टीपणामुळे आणि लोकशाहीविरोधी व्यवहारामुळे झालेले नुकसान क्रिकेटपटूंनी केलेल्या ट्विट्समुळे भरून निघणारे नाही, अशी टीका शशी थरूर यांनी केली आहे. केंद्र सरकारने कायदे मागे घ्यावेत, शेतकऱ्यांच्या समस्यांचे चर्चेतून निराकरण करावे आणि मगच तुम्हाला एकत्रित, एकसंध भारत पाहायला मिळेल, असा टोलाही शशी थरूर यांनी लगावला आहे. 

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अमान्य: सचिन तेंडुलकर

सरकारच्या भूमिकेचे स्वागत

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही सरकारच्या भूमिकेचे स्वागत करताना म्हटले आहे की, भारत एक गौरवशाली राष्ट्र आहे. एक भारतीय म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की, एक राष्ट्र म्हणून आम्ही कोणत्याही समस्या किंवा अडचण जनहिताच्या भावनेने सोडविण्यास पूर्णपणे सक्षम आहोत. जय हिंद असे नारा देत लता मंगेशकर यांनी #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropagenda या दोन हॅशटॅगचा वापर केला आहे. 

सचिन तेंडुलकरचे रिहानाला उत्तर

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात. हस्तक्षेप मात्र करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. देश म्हणून आपण सर्व जण एकत्र राहू, असे ट्विट सचिन तेंडुलकर यांनी केले आहे.

आपण सर्वजण एकत्र राहूया

मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकत्र राहू या. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि मला खात्री आहे की सर्व बाजूंनी एक समाधानकारक तोडगा काढला जाईल जेणेकरून शांतता टिकेल आणि आम्ही सर्वजण पुढे जाऊ, असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणFarmerशेतकरीagitationआंदोलनSachin Tendulkarसचिन तेंडुलकरShashi Tharoorशशी थरूरVirat Kohliविराट कोहलीLata Mangeshkarलता मंगेशकर