शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi Disqualification: “राहुल गांधींना झालेली २ वर्षांची शिक्षा म्हणजे आशेचा किरण”; शशी थरुर हे काय बोलून गेले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 11:41 IST

Rahul Gandhi Disqualification: राहुल गांधींविरोधातील खटल्यात खुद्द पंतप्रधान मोदी तक्रारदार असायला हवे होते, असा टोला शशी थरुर यांनी लगावला.

Rahul Gandhi Disqualification: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ देशभरात काँग्रेसकडून संकल्प सत्याग्रहाचे आंदोलन करण्यात येत आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीकाही केली जात आहे. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी, राहुल गांधी यांना न्यायालयाकडून सुनावण्यात आलेली २ वर्षांची शिक्षा म्हणजे आशेचा किरण असल्याचे म्हटले आहे. 

मोदी आडनावावरून विधान केल्याने राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच जामीनही दिला. यावर बोलताना, मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना दोन वर्षांची झालेली शिक्षा हा आशेचा किरण आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची अभूतपूर्व एकजूट झाली आहे. आम्ही प्रादेशिक पक्षांना प्रत्येक राज्यात काँग्रेसचा एक प्रतिस्पर्धी मानत आलो. मात्र, या परिस्थितीत ते सर्व पक्ष आमच्या बाजूने आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तेलंगणमध्ये के. चंद्रशेखर राव यापूर्वी कधीही काँग्रेससोबत नव्हते, मात्र आता ते आमच्यासोबत आहेत, असे शशी थरुर यांनी नमूद केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

ही एकजूट भाजपविरोधात आतापर्यंतची सर्वांत मोठी शक्ती म्हणून समोर आली

शशी थरूर पुढे म्हणाले की, विरोधकांची ही एकजूट भाजपविरोधात आतापर्यंतची सर्वांत मोठी शक्ती म्हणून समोर आली आहे. हा भाजपच्या कृतीचा निषेध आहे. तिरुअनंतपुरमच्या खासदाराने राहुल गांधींवरील आरोप हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. कारण ललित मोदी किंवा नीरव मोदी दोघेही पळून गेले आहेत. परदेशात ते चैनीचे जीवन जगत आहेत. तो मागासवर्गीय आहेत आणि हा ओबीसी समाजावर हल्ला आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे, असे शशी थरुर यांनी सांगितले.

दरम्यान, राहुल गांधींवरील खटला कमकुवत आहे. आमच्याकडे चांगले वकील आहेत. चौथे मोदी म्हणजेच पूर्णेश मोदी हे सिद्ध करू शकत नाहीत की, त्यांना कोणत्याही प्रकारे लक्ष्य करण्यात आले. राहुल गांधी यांच्या वकिलाने न्यायालयीन कामकाजात सुरुवातीपासूनच त्रुटी असल्याचा युक्तिवाद केला आहे. राहुल गांधींनी आपल्या भाषणात त्यांच्यावर टीका केलेली नाही. आमदार पूर्णेश मोदी यांच्याऐवजी या प्रकरणात पंतप्रधान मोदींनीच तक्रारदार असायला हवे होते, असा टोला शशी थरुर यांनी लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरRahul Gandhiराहुल गांधी