शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

"राजकारण नको पण अशा स्थितीत त्यांनी मणिपूरला...", भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून राहुल गांधींचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 14:41 IST

manipur violence latest news : दोन महिन्यांपासून हिंसाचारात होरपळले मणिपूर आताच्या घडीला देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.

नवी दिल्ली : मागील जवळपास दोन महिन्यांपासून मणिपूर राज्यात हिंसाचाराची आग आहे. अनेक निष्पाप नागरिक यात मृत्यूमुखी पडले. मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात अयशस्वी ठरलेले राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आज राज्यपालांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू होती. पण शुक्रवारी अनेक नाट्यमय घडामोडींनतर सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. मणिपूरमधील हिंसाचारावरून विरोधक सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहेत. अशातच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूर दौऱ्यावरून जाऊन पीडितांची भेट घेतली. 

दरम्यान, राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्यावरून देखील राजकारण चांगलेच तापले. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर काहीच का बोलत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. तर राहुल गांधींचा दौरा म्हणजे केवळ ड्रामा असल्याचे प्रत्युत्तर भाजपाने दिले. पण मणिपूर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षा ए शारदा देवी यांनी राहुल गांधींच्या दौऱ्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून गांधींचे कौतुक एएनआयने या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना शारदा देवी यांनी म्हटले, "सध्याच्या परिस्थितीत राहुल गांधी यांनी मणिपूरला दिलेली भेट याचे कौतुक वाटते. तसेच ही परिस्थिती सोडवणे आणि शांतता प्रस्थापित करणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या मुद्द्याचे राजकारण कोणीही करू नये." 

"जनतेचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास""परिस्थिती सुधारेल असा विश्वास असल्याने जनता मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देत बाहेर आली आहे. आता परिस्थिती नियंत्रणात न आल्यास हाताबाहेर जाऊ शकते, असा लोकांचा विश्वास आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती ही मागील सरकारच्या कारभारामुळे ओढवली आहे. मुख्यमंत्री बीरेन यांच्या सरकारवर जनतेचा पूर्ण विश्वास आहे", असेही प्रदेशाध्यक्षा ए शारदा देवी यांनी म्हटले. 

खरं तर मागील रविवारी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी शनिवारीच गृहमंत्री शहा यांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत १८ पक्षांची सर्वपक्षीय बैठक घेतली होती. बैठकीत सपा आणि आरजेडीने मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही करण्यात आली होती. 

कार्यकर्त्यांचा हंगामा अन् अखेर खुलासाशुक्रवारी मुख्यमंत्री बिरेन सिंह पदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले होते. अशातच काही महिला समर्थकांनी राजभवनासमोर आंदोलन करून मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे जाऊ दिला नाही. यादरम्यान काही महिला आंदोलकांनी मुख्यमंत्र्याचे राजीनामा पत्र फाडले आणि त्यांच्या राजीनाम्यास विरोध दर्शवला. मोठ्या गदारोळानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे सिंह यांनी जाहीर केले. 

 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा