शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राहुल गांधी म्हणाले, "कोरोनापासून वाचण्याचा फक्त एकच मार्ग, संपूर्ण लॉकडाऊन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 11:31 IST

Coronavirus In India : गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून देशात दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्यासध्या देशात ३४,४७,१३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात दररोज साडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण पडताना दिसत आहे. गेल्यावर्षी सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी टीका केली होती. परंतु आता कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव उपाय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच हे बोलताना त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. "भारत सरकारला समजत नाहीये. या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकमात्र मार्ग आहे आणि तो म्हणजे संपूर्ण लॉकडाऊन. भारत सरकारच्या निष्क्रियतेमुळे अनेक निष्पाप लोकांचा जीव जात आहे," असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला.  गेल्या चोवीस तासांत देशात ३, ५७,२२९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ३,२०,२८९ जणांनी कोरोनावर मात केली. देशात गेल्या चोवीस तासांत ३,४४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशात ३४,४७,१३३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली. तसंच आतापर्यंत देशात १५,८९,३२,९२१ नागरिकांचं लसीकरण झालं असल्याचंही सांगण्यात आलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीIndiaभारतTwitterट्विटर