शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘डबल इंजिन’मध्ये कोणत्या इंजिनला किती कमिशन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 05:20 IST

राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर सवाल

बंगळुरू : कर्नाटकातील भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी असा सवाल केला की, डबल इंजिन सरकारच्या प्रत्येक इंजिनला ४० टक्के कमिशनमधून किती मिळाले.

अदानी यांचा मुद्दा संसदेत उपस्थित केल्याबद्दल पंतप्रधानांनी आपल्याला खासदार म्हणून अपात्र ठरविल्याचा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून कर्नाटकात भाजपचे सरकार आहे आणि पंतप्रधानांना इथल्या भ्रष्टाचाराची माहिती आहे. तुम्ही त्याला फक्त ‘डबल इंजिन सरकार’ म्हणता. यावेळी दुहेरी इंजिन चोरीला गेले आहे. कर्नाटकातील कंत्राटदारांच्या संघटनेने पंतप्रधानांना पत्र लिहिले की, त्यांच्याकडून ४० टक्के कमिशन आकारले जाते. परंतु, मोदींनी उत्तर दिले नाही.

‘चोरी करून आले, चोरीच करणार’

राहुल गांधी म्हणाले की, तुमचे सरकार तीन वर्षांपूर्वी चोरीला गेले. चोरी करून आलेले सरकार चोरीच करणार. याला चोरीशिवाय दुसरे काही कळत नाही. वांशिक हिंसाचारामुळे ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झालेल्या मणिपूरमधील ज्वलंत परिस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले की, लोक मारले जात आहेत, परंतु पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना त्याची चिंता नाही.

भ्रष्टाचार राेखण्यासाठी काय केले?

ते म्हणाले की, पंतप्रधान येतात आणि म्हणतात की, काँग्रेसने ९१ वेळा शिवीगाळ केली. पण त्यांनी आधी कर्नाटकला सांगायला हवे की, त्यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काय केले, कोणती चौकशी झाली आणि किती लोकांना तुरुंगात टाकले. 

घाेटाळ्यांवरून घेरण्याचा प्रयत्न

घोटाळ्यांबाबत ते म्हणाले की, पोलिस उपनिरीक्षक, सहायक प्राध्यापक, सहायक अभियंता यांच्या भरतीमध्ये आणि प्रसिद्ध म्हैसूर सॅन्डल साबण बनविणाऱ्या कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडमध्ये प्रचंड अनियमितता झाली आहे. म्हैसूर चंदन घोटाळ्यात एका आमदाराच्या मुलाला ८ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह पकडण्यात आले आणि भाजपच्या एका आमदाराने सांगितले की, २,५०० कोटी रुपये देऊन मुख्यमंत्रिपद विकत घेता येते.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKarnatak Politicsकर्नाटक राजकारण