शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

PM मोदींची गॅरंटी ही तरूणांसाठी धोक्याची घंटा; बेरोजगारीवरून राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 17:06 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत.

देशातील वाढत्या बेरोजगारीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या रिक्त पदांचा दाखला देत सरकारला खडेबोल सुनावले. खरं तर रेल्वे मंत्रालयाने ५ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. रेल्वेत पाच वर्षांनी भरती होत असून जागा कमी करण्यात आल्या आहेत, असे धोरण कुणाच्या फायद्यासाठी केले जात आहे? असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला.  

रेल्वे मंत्रालयाने असिस्टंट लोको पायलटच्या (ALP) ५६९६ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहुल गांधी म्हणाले की, देशातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगारीचा सामना करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा मोठी फसवणूक झाली. जे सामान्य कुटुंबातून आले आहेत आणि १८-१८ तास मेहनत करतात, अशा विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. ही मुले लहान भाड्याच्या खोलीत राहतात आणि मोठी स्वप्ने पाहतात. रेल्वेने पाच वर्षांनंतर ५६९६ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांवर अन्याय होत आहे. 

तसेच रेल्वेतील नोकर भरती कमी करण्याचे धोरण कोणाच्या फायद्यासाठी राबवले जात आहे? दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार असल्याचे आश्वासन कुठे गेले? रेल्वेचे खासगीकरण न करण्याचे आश्वासन कुठे गेले? एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, मोदींची गॅरंटी ही तरुणांसाठी धोक्याची घंटा आहे. म्हणून आपल्याला त्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आवाज उठवला पाहिजे, असेही राहुल गांधींनी नमूद केले. 

रेल्वेने भरतीसाठी अर्ज मागवले असले तरी अत्यंत कमी जागा असल्याचा दाखला देत राहुल गांधींनी निशाणा साधला. "एकीकडे रेल्वेत लाखो पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता केवळ ५६९६ पदांसाठी भरती होत असून हा तरूणांवर अन्याय आहे. रेल्वेत भरती कमी का केली जात आहे, कोणाच्या फायद्यासाठी भरती कमी करण्याचे हे धोरण आखले जात आहे, असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUnemploymentबेरोजगारीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस