शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

PM मोदींची गॅरंटी ही तरूणांसाठी धोक्याची घंटा; बेरोजगारीवरून राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 17:06 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत.

देशातील वाढत्या बेरोजगारीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या रिक्त पदांचा दाखला देत सरकारला खडेबोल सुनावले. खरं तर रेल्वे मंत्रालयाने ५ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. रेल्वेत पाच वर्षांनी भरती होत असून जागा कमी करण्यात आल्या आहेत, असे धोरण कुणाच्या फायद्यासाठी केले जात आहे? असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला.  

रेल्वे मंत्रालयाने असिस्टंट लोको पायलटच्या (ALP) ५६९६ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहुल गांधी म्हणाले की, देशातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगारीचा सामना करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा मोठी फसवणूक झाली. जे सामान्य कुटुंबातून आले आहेत आणि १८-१८ तास मेहनत करतात, अशा विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. ही मुले लहान भाड्याच्या खोलीत राहतात आणि मोठी स्वप्ने पाहतात. रेल्वेने पाच वर्षांनंतर ५६९६ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांवर अन्याय होत आहे. 

तसेच रेल्वेतील नोकर भरती कमी करण्याचे धोरण कोणाच्या फायद्यासाठी राबवले जात आहे? दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार असल्याचे आश्वासन कुठे गेले? रेल्वेचे खासगीकरण न करण्याचे आश्वासन कुठे गेले? एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, मोदींची गॅरंटी ही तरुणांसाठी धोक्याची घंटा आहे. म्हणून आपल्याला त्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आवाज उठवला पाहिजे, असेही राहुल गांधींनी नमूद केले. 

रेल्वेने भरतीसाठी अर्ज मागवले असले तरी अत्यंत कमी जागा असल्याचा दाखला देत राहुल गांधींनी निशाणा साधला. "एकीकडे रेल्वेत लाखो पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता केवळ ५६९६ पदांसाठी भरती होत असून हा तरूणांवर अन्याय आहे. रेल्वेत भरती कमी का केली जात आहे, कोणाच्या फायद्यासाठी भरती कमी करण्याचे हे धोरण आखले जात आहे, असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUnemploymentबेरोजगारीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस