शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींची गॅरंटी ही तरूणांसाठी धोक्याची घंटा; बेरोजगारीवरून राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 17:06 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत.

देशातील वाढत्या बेरोजगारीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या रिक्त पदांचा दाखला देत सरकारला खडेबोल सुनावले. खरं तर रेल्वे मंत्रालयाने ५ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. रेल्वेत पाच वर्षांनी भरती होत असून जागा कमी करण्यात आल्या आहेत, असे धोरण कुणाच्या फायद्यासाठी केले जात आहे? असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला.  

रेल्वे मंत्रालयाने असिस्टंट लोको पायलटच्या (ALP) ५६९६ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहुल गांधी म्हणाले की, देशातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगारीचा सामना करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा मोठी फसवणूक झाली. जे सामान्य कुटुंबातून आले आहेत आणि १८-१८ तास मेहनत करतात, अशा विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. ही मुले लहान भाड्याच्या खोलीत राहतात आणि मोठी स्वप्ने पाहतात. रेल्वेने पाच वर्षांनंतर ५६९६ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांवर अन्याय होत आहे. 

तसेच रेल्वेतील नोकर भरती कमी करण्याचे धोरण कोणाच्या फायद्यासाठी राबवले जात आहे? दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार असल्याचे आश्वासन कुठे गेले? रेल्वेचे खासगीकरण न करण्याचे आश्वासन कुठे गेले? एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, मोदींची गॅरंटी ही तरुणांसाठी धोक्याची घंटा आहे. म्हणून आपल्याला त्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आवाज उठवला पाहिजे, असेही राहुल गांधींनी नमूद केले. 

रेल्वेने भरतीसाठी अर्ज मागवले असले तरी अत्यंत कमी जागा असल्याचा दाखला देत राहुल गांधींनी निशाणा साधला. "एकीकडे रेल्वेत लाखो पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता केवळ ५६९६ पदांसाठी भरती होत असून हा तरूणांवर अन्याय आहे. रेल्वेत भरती कमी का केली जात आहे, कोणाच्या फायद्यासाठी भरती कमी करण्याचे हे धोरण आखले जात आहे, असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUnemploymentबेरोजगारीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस