शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

"मणिपूर हिंसाचारावर सर्वपक्षीय बैठक तेव्हा बोलावली आहे, जेव्हा...", राहुल गांधींंनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 16:20 IST

Manipur Violence : मणिपूरमधील स्थिती पाहता केंद्र सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 

Rahul Gandhi On Manipur Violence | नवी दिल्ली : मणिपूरमधील सद्य स्थिती पाहता केंद्र सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मागील जवळपास दोन महिन्यांपासून दंगली, जाळपोळ आणि हत्या यामुळे मणिपूरने अवघ्या जगाचे लक्ष वेधले आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमधील परिस्थिती पाहता केंद्राने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सरकारवर निशाणा साधला. 

दरम्यान, मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २४ जून रोजी दुपारी ३ वाजता दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या संदर्भात बुधवारी गृह मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. याबद्दल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले, "मणिपूर ५० दिवसांपासून जळत आहे, पण पंतप्रधान गप्प आहेत. खुद्द पंतप्रधान देशात नसताना सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांसाठी ही बैठक महत्त्वाची नाही, हे स्पष्ट आहे."

मणिपूरला सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याची केली होती मागणीखरं तर आठवडाभरापूर्वीही राहुल गांधी यांनी मणिपूरमधील परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता आणि राज्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याची मागणी केली होती. १५ जून रोजी राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले होते, "भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाने मणिपूरला ४० दिवसांपेक्षा जास्त काळ जळत राहावे लागले, ज्यामध्ये शंभरहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. पंतप्रधानांचे हे अपयश असून ते गप्प आहेत. हिंसाचाराचे हे चक्र संपवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यात पाठवले पाहिजे. द्वेषाचा हा बाजार बंद करू आणि मणिपूरमधील प्रत्येक हृदयात प्रेमाचे दुकान खोलूया." 

   

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेस