शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

"मणिपूर हिंसाचारावर सर्वपक्षीय बैठक तेव्हा बोलावली आहे, जेव्हा...", राहुल गांधींंनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 16:20 IST

Manipur Violence : मणिपूरमधील स्थिती पाहता केंद्र सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 

Rahul Gandhi On Manipur Violence | नवी दिल्ली : मणिपूरमधील सद्य स्थिती पाहता केंद्र सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मागील जवळपास दोन महिन्यांपासून दंगली, जाळपोळ आणि हत्या यामुळे मणिपूरने अवघ्या जगाचे लक्ष वेधले आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमधील परिस्थिती पाहता केंद्राने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सरकारवर निशाणा साधला. 

दरम्यान, मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २४ जून रोजी दुपारी ३ वाजता दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या संदर्भात बुधवारी गृह मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. याबद्दल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले, "मणिपूर ५० दिवसांपासून जळत आहे, पण पंतप्रधान गप्प आहेत. खुद्द पंतप्रधान देशात नसताना सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांसाठी ही बैठक महत्त्वाची नाही, हे स्पष्ट आहे."

मणिपूरला सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याची केली होती मागणीखरं तर आठवडाभरापूर्वीही राहुल गांधी यांनी मणिपूरमधील परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता आणि राज्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याची मागणी केली होती. १५ जून रोजी राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले होते, "भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाने मणिपूरला ४० दिवसांपेक्षा जास्त काळ जळत राहावे लागले, ज्यामध्ये शंभरहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. पंतप्रधानांचे हे अपयश असून ते गप्प आहेत. हिंसाचाराचे हे चक्र संपवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यात पाठवले पाहिजे. द्वेषाचा हा बाजार बंद करू आणि मणिपूरमधील प्रत्येक हृदयात प्रेमाचे दुकान खोलूया." 

   

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेस