शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

शेतकऱ्यांवर 'मित्रां'च्या कायद्याचा वार, हेच आहे मोदी सरकार; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 16:09 IST

rahul gandhi : युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, जनतेवर महागाईचा अत्याचार म्हणत राहुल गांधींची सरकारवर टीका

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाचा आज ३४ वा दिवसनोव्हेंबर महिन्यात बेरोजगारीच्या प्रमाणातही वाढ

देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. अशातच बरोजगारीचंही संकट देशासमोर उभं राहिलं आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात रोजगारात ०.९ टक्क्यांची घट झाली. त्यामुळे तब्बल ३५ लाख नोकऱ्यांवर संकट उभं राहिलं. यावरून आता काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ऑक्टोबर महिन्यातही रोजगारात ०.१ टक्क्यांची घट झाली होती."युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, जनतेवर महागाईचा अत्याचार. शेतकऱ्यांवर मित्रांच्या कायद्यांचा वार, हेच आहे मोदी सरकार," असं म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रावर हल्लाबोल केला. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आदोलनगेल्या ३३ दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा ३४ वा दिवस आहे. दरम्यान, हे शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी शेतकरी नेते आणि सरकारमध्ये ३० डिसेंबर रोजी चर्चा पार पडणार आहे. या चर्चेसाठी शेतकरी संघटनाही तयार असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी शेतकरी नेत्यांकडून ही चर्चा २९ डिसेंबर रोजी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु सोमवारी सरकारकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात ३० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता विज्ञान भवनात शेतकरी संघटनांना आमंत्रित करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. २६ नोव्हेंबरपासून ४० शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.बेरोजगारीत वाढऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात बरोजगारीचं प्रमाण वाढल्यानं चिंतेतही वाढ झाली आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात हा ट्रेंड कमी होईल अशी शक्यता सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीनं व्यक्त केली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीनं जाहीर केलेल्या अहलानुसार मागील महिन्यात ३९.९ कोटी लोकांकडे रोजगार गोता. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २.४ टक्क्यांची घट झाली आहे. बाजारातील चांगल्या रिकव्हरीनंतरही मार्च २०२० पासून रोजगारात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. कमी प्रमाणात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमुळे लोकं श्रम बाजारातून बाहेर पडू लागले असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसFarmer strikeशेतकरी संपNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्ली