शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नोकरी मागितल्यावर मोदी सरकार तरुणांना देशद्रोही ठरवतंय; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 14:34 IST

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी यांची पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकाबेरोजगारीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल#StudentsWantJobs या हॅशटॅगचा वापर

नवी दिल्ली : देशात आताच्या घडीला बेरोजगारी हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा असल्याचे पाहायला मिळत आहे. सन २०१९ मध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर बेरोजगारीची समस्या आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. नोकरी मागितल्यावर तरुणांना हे मोदी सरकार देशद्रोही ठरवत आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. (congress leader rahul gandhi criticised modi govt over unemployment)

राहुल गांधी यांनी एक ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी विविध विषयांवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. शुक्रवारी सकाळी केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी #StudentsWantJobs या हॅशटॅगचा वापर करत विद्यार्थ्यांना नोकरी पाहिजे, मात्र सरकार पोलिसांच्या छड्या, वॉटर गनचा वापर, देशद्रोह्याचा शिक्का आणि बेरोजगारी देत आहे, अशी टीका त्यांनी केली. 

भारत आता लोकशाही असलेला देश राहिला नाही

स्वीडनमधील व्ही-डेमोक्रसी नावाच्या एका संस्थेने लोकशाही बाबत एक अहवाल सादर केला आहे. या संस्थेच्या अहवालाचा हवाला देत राहुल गांधी यांनी, भारत आता हा लोकशाही असेलेला देश राहिला नसल्याचे मोठे वक्तव्य केले. त्यांनी एका वृत्ताचा स्क्रिनशॉट आपल्या ट्विटर अकाऊंटवरून करत हा दावा केला. 

ना प्रायव्हेट जॉब, ना बिझनेस... बेरोजगारीच्या संकटात तरुणांना हवीय सरकारी नोकरी 

दरम्यान, राष्ट्रीय निवडणूक सर्व्हेक्षण अहवालात २५ टक्के तरुणांनी बेरोजगारीची समस्या हा सर्वांत मोठा मुद्दा असल्याचे लोकसभा निवडणुकीवेळी सांगितल्याचे म्हटले आहे. देशभरातील राज्यांमध्ये रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध असल्या, तरी अधिकाधिक तरुण वर्ग सरकारी नोकरीसाठी असलेल्या परीक्षांची तयारी करत असल्याचे या सर्व्हेतून समोर आले आहे. तीनपैकी दोन तरुणांनी खासगी नोकरी, सरकारी नोकरी की स्वतःचा व्यवसाय या पर्यायांमधून सरकारी नोकरीचा पर्याय निवडला. तर १० पैकी एका तरुणाने खासगी नोकरीचा पर्याय निवडल्याचे या सर्व्हेमधून समोर आले आहे.  

टॅग्स :UnemploymentबेरोजगारीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार