शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

"शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा एकदा स्वतंत्र होईल", राहुल गांधींची शेतकऱ्यांशी 'दिल की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 16:06 IST

राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आवाज उठवल्याने हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले आणि आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळेल असं राहुल यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. मोदी सरकारविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र यानंतर आता राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांशी 'दिल की बात' च्या माध्यमातून संवाद साधला आहे. "शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा एकदा स्वतंत्र होईल" असं म्हटलं आहे. 

राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आवाज उठवल्याने हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले आणि आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळेल असं राहुल यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांशी केलेल्या चर्चेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. एल. पुनिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक छोटा व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच आपल्या थाळीत अन्न देण्यास शेतकरी विसरत नाहीत. मग त्यांना आपण कसं विसरू शकतो. ते आपल्यासाठी पीक उगवतात आणि आपण त्यांच्यासाठी आवाज उठवू नये?, राहुल गांधींच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अन्नदात्याचा हा आवाज ऐका, असं ट्वीट पुनिया यांनी केलं आहे.

शेतकऱ्यांना राहुल गांधींनी एमएसपी संपुष्टात येईल का? असा प्रश्न विचारला आहे. कृषी कायद्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असेल तर मग सरकार एमएसपीसाठी कायदा का करत नाही. अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींचा कृषी कायद्याचा फायदा होणार आहे असं यावर शेतकरी म्हणाले आहेत. तसेच ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार होता, तसाच कारभार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. जर आज महात्मा गांधी जिवंत असते तर त्यांनी या कायद्याला विरोध केला असता, असं एका शेतकऱ्याने सांगितलं. त्यावर शेतकर्‍यांच्या आवाजाने हिंदुस्थान स्वतंत्र झाला आणि आज पुन्हा एकदा हिंदुस्थान शेतकऱ्यांच्या आवाजाने स्वतंत्र होईल असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

"कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा, भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा"

कृषी विधेयकावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा" असं म्हणत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच कृषी विधेयकं मंजूर करताना उपसभापतींनी केलेल्या दाव्याचं त्यांनी खंडन केलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. विधेयकं मंजूर करताना विरोधक जागेवर बसले नाही असं राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी म्हटलं होतं. मात्र वेगळंच चित्र दिसत आहे. यावरून राहुल यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.

"शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेरही चिरडला जातोय"

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं एक ट्विट केलं आहे. "कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेरही चिरडला जात आहे. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा" असं म्हणत राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. याआधीही राहुल यांनी कृषी  विधेयकावरून सरकारवर जोरदार टीका करत निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी "एका चुकीच्या वस्तू आणि सेवा कराने सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (MSME) संपवलं. आता नवे कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांना गुलाम बनवतील" असं म्हटलं होतं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसFarmerशेतकरीagricultureशेतीIndiaभारत