शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

PM मोदी अन् त्यांची चापलुसी करणाऱ्यांनी भारताची हजारो किमी जमीन चीनला सोपवली; राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 17:23 IST

भारत आणि चीन यांच्यात 31 जुलैला लष्करी चर्चेची 12 वी फेरी झाली. या बैठकीत हॉट स्प्रिंग, गोगरा आणि पूर्व लडाखमधील तणाव असलेल्या विविध भागांतून सैन्य तत्काळ मागे घेण्यावर भर देण्यात आला.

नवी दिल्ली - भारत आणि चीन दरम्यानच्या सीमावादावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी ट्विट करत आरोप केला आहे, की पंतप्रधान मोदी आणि त्यांची चापलुसी करणाऱ्यांनी भारताची हजारो किलोमीटर जमीन चीनला दिली आहे. आम्ही ती परत कधी मिळवत आहोत? (Congress leader Rahul gandhi attacks on PM Narendra Modi over india china border issue)

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की "मोदीजी आणि त्यांची चापलुसी करणाऱ्यांनी भारतीची हजारो किलोमीटर जमीन चीनला दिली. आम्ही ते परत कधी मिळवत आहोत?" राहुल गांधी यांनी या मुद्यावरून सरकारला घेरण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वीही त्यांनी अनेक वेळा याच मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले आहे.

भारत आणि चीन यांच्यात 31 जुलैला लष्करी चर्चेची 12 वी फेरी झाली. या बैठकीत हॉट स्प्रिंग, गोगरा आणि पूर्व लडाखमधील तणाव असलेल्या विविध भागांतून सैन्य तत्काळ मागे घेण्यावर भर देण्यात आला. दोन्ही देशांतील ही चर्चा जवळपास नऊ तास चालली. अशातच राहुल गांधी यांचे हे ताजे ट्विट आले आहे.

भारत-चीन यांच्यात झालेल्या लष्करी चर्चेच्या 12 व्या फेरीच्या सुमारे दोन आठवडे आधी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना स्पष्टपणे सांगितले होते की, पूर्व लडाखमधील सततच्या संघर्षामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर नकारात्मक परिणाम होत आहे. ताझाकिस्तानची राजधानी दुशांबे येथे 14 जुलै रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी भारताला संधी -जगातील सर्वात शक्तीशाली 15 सदस्य असलेली संस्था संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी भारताला संधी मिळाली आहे. फ्रान्सकडून भारताला पुढील कार्यभार सोपविण्यात आला आहे. भारतासोबत समुद्री सुरक्षा, दहशतवाद तसेच अन्य मुद्द्यांवर काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे फ्रान्सचे राजदूत इमैनुएल लेनैन यांनी म्हटले आहे. भारताला हे अध्यक्षपद मिळालेल्याने चीन आणि पाकिस्तानला धक्का बसला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनladakhलडाखBJPभाजपाcongressकाँग्रेस