शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

PM मोदी अन् त्यांची चापलुसी करणाऱ्यांनी भारताची हजारो किमी जमीन चीनला सोपवली; राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 17:23 IST

भारत आणि चीन यांच्यात 31 जुलैला लष्करी चर्चेची 12 वी फेरी झाली. या बैठकीत हॉट स्प्रिंग, गोगरा आणि पूर्व लडाखमधील तणाव असलेल्या विविध भागांतून सैन्य तत्काळ मागे घेण्यावर भर देण्यात आला.

नवी दिल्ली - भारत आणि चीन दरम्यानच्या सीमावादावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी ट्विट करत आरोप केला आहे, की पंतप्रधान मोदी आणि त्यांची चापलुसी करणाऱ्यांनी भारताची हजारो किलोमीटर जमीन चीनला दिली आहे. आम्ही ती परत कधी मिळवत आहोत? (Congress leader Rahul gandhi attacks on PM Narendra Modi over india china border issue)

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की "मोदीजी आणि त्यांची चापलुसी करणाऱ्यांनी भारतीची हजारो किलोमीटर जमीन चीनला दिली. आम्ही ते परत कधी मिळवत आहोत?" राहुल गांधी यांनी या मुद्यावरून सरकारला घेरण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वीही त्यांनी अनेक वेळा याच मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले आहे.

भारत आणि चीन यांच्यात 31 जुलैला लष्करी चर्चेची 12 वी फेरी झाली. या बैठकीत हॉट स्प्रिंग, गोगरा आणि पूर्व लडाखमधील तणाव असलेल्या विविध भागांतून सैन्य तत्काळ मागे घेण्यावर भर देण्यात आला. दोन्ही देशांतील ही चर्चा जवळपास नऊ तास चालली. अशातच राहुल गांधी यांचे हे ताजे ट्विट आले आहे.

भारत-चीन यांच्यात झालेल्या लष्करी चर्चेच्या 12 व्या फेरीच्या सुमारे दोन आठवडे आधी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना स्पष्टपणे सांगितले होते की, पूर्व लडाखमधील सततच्या संघर्षामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर नकारात्मक परिणाम होत आहे. ताझाकिस्तानची राजधानी दुशांबे येथे 14 जुलै रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी भारताला संधी -जगातील सर्वात शक्तीशाली 15 सदस्य असलेली संस्था संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी भारताला संधी मिळाली आहे. फ्रान्सकडून भारताला पुढील कार्यभार सोपविण्यात आला आहे. भारतासोबत समुद्री सुरक्षा, दहशतवाद तसेच अन्य मुद्द्यांवर काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे फ्रान्सचे राजदूत इमैनुएल लेनैन यांनी म्हटले आहे. भारताला हे अध्यक्षपद मिळालेल्याने चीन आणि पाकिस्तानला धक्का बसला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनladakhलडाखBJPभाजपाcongressकाँग्रेस