शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

२०१४ नंतर देशात 'असा' वाढला ड्रॅगन; राहुल गांधींकडून आकडेवारी शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 14:22 IST

मेक इंडिया म्हणायचं अन् चीनमधून विकत घ्यायचं; राहुल गांधींचा आकडेवारीसह हल्ला

नवी दिल्ली: चीनसोबतचा सीमावाद वाढत असताना, दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असताना मोदी सरकारनं ५९ चिनी अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घातली. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर आकडेवारीसह निशाणा साधला आहे. २०१४ पासून देशात ड्रॅगन कसा वाढला, याची माहिती राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे.  मोदी सरकारनं काल चिनी अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाष्य करताना राहुल यांनी गेल्या सहा वर्षांत चीनमधून होणारी आयात कशी वाढली, याची आकडेवारी ट्विट केली. 'आकडे खोटं बोलत नाहीत. भाजप म्हणतो मेक इन इंडिया. पण असं म्हणून ते चीनकडून खरेदी करतात,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आणि भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात चीनकडून होणारी आयात यांची तुलना राहुल यांनी केली आहे. २००८ ते २०१४ या सहा वर्षांच्या कालावधीत चीनकडून होणाऱ्या आयातीचं प्रमाण १४ टक्के होतं. तेच प्रमाण भाजपप्रणित एनडीए सरकारच्या काळात १८ टक्क्यांवर गेलं. २००८ मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना चीनमधून होणारी आयात १२ टक्के होती. २०१२ मध्ये ती १४ टक्क्यांवर पोहोचली. त्यानंतर २०१४ नंतर हेच प्रमाण १३ टक्क्यांवर आलं, अशी आकडेवारी राहुल यांनी दिली आहे.'मोदींच्या नेतृत्त्वाखाली सरकार येताच २०१५ मध्ये चीनमधून होणारी आयात १४ टक्क्यांवर गेली. आयातीचं प्रमाण २०१६ मध्ये १६ टक्के, २०१७ मध्ये १७ टक्के आणि २०१८ मध्ये १८ टक्क्यांपर्यंत गेलं,' अशी माहिती राहुल यांनी दिली आहे. राहुल यांनी केलेलं ट्विट काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी रिट्विट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या सातत्यानं योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील योगी आदित्यनाथ सरकारला लक्ष्य करत आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसManmohan Singhमनमोहन सिंगchinaचीन