शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांना विचारा रेल्वे अपघात का झाला... ते म्हणतील ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने 'हे' केलं होतं; राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 09:39 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित केले.

Odisha Train Accident : बालासोर येथे रेल्वेच्या झालेल्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. मालगाडी तीन रेल्वेगाड्यांना झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांची संख्या २८८ वर पोहोचली असून ११७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. यावर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 

Odisha Train Accident : 'आमची जबाबदारी अजून संपलेली नाही...; ओडिशा रेल्वे अपघातावर बोलताच मंत्री अश्विनी वैष्णव भावूक झाले

काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी म्हणाले, 'तुम्ही मोदी सरकारला काहीही विचाराल, ते मागे बघतील. त्यांना विचारा रेल्वे अपघात का झाला? ते म्हणतील पहा काँग्रेसने हे ५० वर्षांपूर्वी केले होते. ओडिशात शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

राहुल गांधी अमेरिकेतील वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. सोमवारी त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारला विचारा की तुम्ही पाठ्यपुस्तकातून पीरियोडिक टेबल का काढला? ते लगेच म्हणतील की काँग्रेसने हे ६० वर्षांपूर्वी केले होते.

राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकार लगेच उत्तर देतात की, मागे वळून पहा. आता विचार करावा लागेल. तुम्ही सर्व कारने इथे आला आहात का. कल्पना करा की कार चालवताना तुम्ही फक्त मागील आरशात पाहिले तर काय होईल? तुम्ही गाडी चालवू शकाल का? तुमचे एकामागून एक अपघात होत असतील. प्रवासी तुम्हाला विचारतील तुम्ही काय करत आहात?, असंही राहुल गांधी म्हणाले. 

राहुल गांधी म्हणाले, ही पंतप्रधान मोदींची विचारसरणी आहे. त्यांना भारताची गाडी चालवायची आहे, पण ते फक्त मागे वळून पाहतात. गाडी पुढे का सरकत नाही, पुन्हा पुन्हा का धक्के मारत आहे, याचा विचार त्यांना करता येत नाही. ही भाजप आणि संघाची विचारसरणी आहे. तुम्ही मंत्री आणि पंतप्रधान बोलताना ऐका, ते फक्त इतिहासावर बोलतात. भविष्याबद्दल कोणी बोलत नाही. ते फक्त इतिहासासाठी लोकांना जबाबदार धरत आहेत.

 'भारतात वेगवेगळ्या विचारधारांची लढाई आहे. एक भाजपचा आणि एक काँग्रेसचा, एकीकडे नथुराम गोडसेची विचारसरणी आहे आणि दुसरीकडे महात्मा गांधींची विचारधारा पुढे नेत आहोत. त्यावेळी अमेरिकेपेक्षा मोठी शक्ती असलेल्या ब्रिटिशांशी गांधीजींनी युद्ध केले. तुम्ही लोक गांधी, आंबेडकर, पटेल, नेहरू यांच्या पावलावर पाऊल टाकत आहात, असंही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीOdisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातcongressकाँग्रेसBJPभाजपा