शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

"महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या, मोहन भागवत यांच्यासोबत का नाही?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 19:58 IST

"त्यांची (मोहन भागवत) संघटना आरएसएस महिला शक्तीला दाबण्याचे काम करत. तर, काँग्रेस संघटना महिलांना पुढे जाण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते."

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाजप आणि संघ महिलांना पुढे येऊ देत नाही, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. याच वेळी त्यांनी, महात्मा गांधी यांच्या फोटोमध्ये साधारणपणे 2-3 महिला दिसतात. पण, मोहन भागवत यांच्या फोटोत महिला का दिसत नाहीत? असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे. (Congress leader Rahul Gandhi ask Mahatma Gandhi seen with women around him why Mohan Bhagwat not)

राहुल गांधी म्हणाले, त्यांची (मोहन भागवत) संघटना आरएसएस महिला शक्तीला दाबण्याचे काम करत. तर, काँग्रेस संघटना महिलांना पुढे जाण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. राहुल गांधी म्हणाले, आरएसएसने आजपर्यंत कोणत्याही महिलेला पंतप्रधान केले नाही. मात्र, काँग्रेसने एका महिलेला देशाचे पंतप्रधान बनवले होते. भाजप सरकारने लक्ष्मी आणि शक्तीला घरातून बाहेर काढले आहे. सरकारने असे धोरण लागू केले आहे, की आज लोकांकडे पैसे नाहीत. नोटाबंदी, जीएसटी आणि कृषी कायदे, यांसारखी समाजविरोधी धोरणे राबवून, या सरकारने लक्ष्मीची संपूर्ण शक्ती आपल्या चार-पाच लोकांच्या हाती सोपविली आहे.

हातात बॅग घेऊन पंतप्रधान 'मोदी' ट्रेननं कुठे निघाले...? आपणही फसलात ना...?

महिला काँग्रेसच्या स्थापना दिन कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले, "जेव्हा आपण महात्मा गांधींचा फोटो पहता, तेव्हा आपल्याला त्यांच्या आजूबाजूला 2-3 महिला दिसतील. याउलट, आपण कधी मोहन भागवत यांचा एखाद्या महिलेसोबत फोटो पाहिला आहे? कारण त्यांची संघटना महिलांना दडपण्याचे काम करत आणि आमचा पक्ष त्यांना व्यासपीठ देते," असे राहुल गांधी म्हणाले.

देशावरील दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचा आशीर्वाद कमी झाला आहे -तत्पूर्वी, माता वैष्णो देवीचे दर्शन घेतल्यानंतर, राहुल गांधी यांनी जम्मूच्या त्रिकुटा नगर येथे कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली होती. तेव्हा ते म्हणाले होते, देशावरील दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचा आशीर्वाद कमी झाला आहे. "काल मी मंदिरात (वैष्णो देवी) गेलो होतो, तेथे मला तीन देवी दिसल्या. दुर्गाजी, लक्ष्मीजी आणि सरस्वतीजी. दुर्गा हा शब्द 'दुर्ग' या शब्दापासून बनला आहे आणि देवी दुर्गा म्हणजे संरक्षण करणारी शक्ती आहे. देवी लक्ष्मी ही एक अशी शक्ती आहे, जी एखादे ध्येय साध्य करण्यास मदत करते. तर देवी सरस्वती शिक्षण आणि ज्ञानाची शक्ती आहे. जेव्हा देशात या तीनही शक्ती असतात तेव्हा देश समृद्ध होतो.''

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMohan Bhagwatमोहन भागवतcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा