शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

भाजप-आरएसएस आसामच्या अस्तित्वाला धोका; अखेर 'तो' मुद्दा प्रियांकांनी निवडणूक प्रचारातच उचलला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 18:25 IST

प्रियंका गांधी यांनी तेजपूर येथे एका मोठ्या रॅलीला संबोधित केले. प्रियंका म्हणाल्या, आसाम तुमची आई आहे आणि आपण आपली ओळख आणि अस्तित्वाचा बचाव करण्यासाठी लढत आहात. (Priyanka gandhi vadra)

 नवी दिल्ल - पूर्वेकडील राज्य पश्चिम बंगालसह आसाममध्येही (Assam) निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. काँग्रेसचा सर्वात मोठा चेहरा म्हणून प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka gandhi vadra) पूर्वेकडील राज्यांत दौराकरून अंदाजही घेत आहेत आणि वातावरण निर्मितीही करत आहेत. आज मंगळवारी प्रियंका गांधींचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो समोर आले. एवढेच नाही, तर त्यांनी यावेळी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधत भाजप (BJP) आणि आरएसएस (RSS) आसामच्या अस्तित्वाला धोका असल्याचे म्हटले आहे. (Congress leader Priyanka gandhi vadra Commented on bjp rss and caa)

प्रियंका यांनी एका स्थानीक वृत्त वाहिनीशी बोलताना, पंतप्रधानांच्या 'आसाममधील चहा धोक्यात आहे.' या विधानावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, एखादे ट्विट केलेल्या आसामचा चहा धोक्यात येत नाही. आसामच्या अस्तित्वावर जो घाव भाजप आणि आरएसएसने घातला आहे, तोच त्याच्या अस्तित्वाला धोका आहे. ना येथे डबल इंजिनचे सरकार हवे आहे, ना रिमोट कंट्रोल असलेले. आसामच्या जनतेला एक नेता, एक सीएम आणि एक पक्ष हवा आहे. जो त्यांच्या अस्तित्वाचे रक्षण करून त्यांच्यासाठी काम करील.

...म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या "या" ज्येष्ठ नेत्याचा पुतळा जाळला, विरोधात केली घोषणाबाजी

CAA आणि NRCच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना प्रियंका म्हणाल्या, देशाची एकता त्यांच्यासाठी समस्या आहे. राज्याची एकताही त्यांच्यासाठी समस्या आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देशात CAA-NRCवर भाष्य केले. मग ते येथे आल्यानंतर गप्प का होतात. भाजपने निवडणुकीपूर्वी म्हटले होते, की आसाममध्ये NRC लागू करणार नाही. मग लागू का केली? असा सवालही प्रियांका यांनी भाजपला केला.

तेजपूरच्या रॅलीत काय म्हणाल्या प्रियांका? प्रियंका गांधी यांनी तेजपूर येथे एका मोठ्या रॅलीला संबोधित केले. प्रियंका म्हणाल्या, आसाम तुमची आई आहे आणि आपण आपली ओळख आणि अस्तित्वाचा बचाव करण्यासाठी लढत आहात. भाजपने आपल्याला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. आम्ही आपल्याला आश्वासन नाही हमी देत आहोत. या पाच हमी आपले चांगले भविष्य घटविण्यासाठी आहेत.

आसाममध्ये काँग्रसेच्या प्रचाराला सुरुवात, प्रियांका गांधींनी केला आदिवासी झूमर डान्स, पाहा VIDEO

1- आम्ही असा कायदा तयार करू, ज्यामुळे येथे CAA लागू होणार नाही.2- आसाममधील गृहिणींसाठी दर महा 2000 रुपये गृहिणी सन्मान निधी दिला जाईल.3- 200 यूनिट वीज मोफत दिली जाईल. यातून दर महिन्याला 1400 रुपयांची बचत होईल.4- चहाच्या मळ्यात काम करणाऱ्यांसाठी 365 रुपये मजुरी दिली जाईल.5- आम्ही युवकांना 5 लाख रोजगार देऊ.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसAssamआसामBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ